आॅनलाईन नव्हे, तर संगणीकृत
By Admin | Updated: July 5, 2015 00:48 IST2015-07-05T00:48:14+5:302015-07-05T00:48:14+5:30
जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली ...

आॅनलाईन नव्हे, तर संगणीकृत
ग्रामपंचायत निवडणूक नामांकन
निकालानंतर मिरवणुकी काढण्यावर बंदी
नामांकनासाठी तहसील कार्यालयात मदतनिसाची व्यवस्था
तालुकास्तरावर प्रथमच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
चंद्रपूर : जिल्ह्यात येत्या ४ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आॅनलाईन नामांकन भरण्याची चर्चा वेगात असली तरी, तसे करण्याची आवश्यक्ता नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्याची गरज नसून उमेदवारांसाठी संगणीकृत उमेदवारी अर्ज असणार आहेत. त्यासाठी ँ३३स्र://स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर नामनिर्देशन भरण्याची सुविधा आहे. भरलेल्या अर्जाचे प्रिंटआऊट संबंधित उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिका-याकडे सादर करावयाचे आहे.
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके उपस्थित होते.
या संदर्भात माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संगणकीकृत अर्ज भरण्याची सुविधा संग्राम केंद्र व महाआॅनलाईन या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ग्रामीण जनतेला संगणकीय प्रणालीचा अनुभव नसल्याने तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मदतनीस ठेवण्यात येणार आहे. मात्र मदतनीसाकडून अर्ज भरुन घेतल्यानंतर तो स्वाक्षरी करण्यापूर्वी बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावी. नामर्निदेशनपत्रातील सर्व रकाणे भरणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतींच्या २ हजार ६८ वार्डसाठी ४ आॅगस्टला निवडणूक होत आहे. यासाठी ९ लाख १६ हजार ४६१ मतदारांची नोंद झाली आहे.
मतदानाच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून मतदान केंद्रांसमोर शेड उभारले जाणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदारांनी आपली नावे यादीत आहेत अथवा नाहीत, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मतदानासाठी निर्धारित १७ ओळखपत्रापैकी कुठलेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. (जिल्हा प्रतिनिधी)
थकबाकीदार नसावा
नामर्निदेशनपत्रासोबत कुठलीही थकबाकी नसल्याचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. परंतु मालमत्ता कराची थकबाकी असल्यास त्याला सुट देण्यात आली आहे. उमेदवारांनी खचार्चा रोजचा हिशेब दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
प्रवगर्वतून नामांकन भरणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला असल्यास त्याचा पुरावा व सहा महिण्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे.
मिरवणुकीवर बंदी
निकालानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यासाठी कुठेही परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. संवेदनशिल मतदान केद्रांच्या याद्या तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.