शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही तर करही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:29 IST

कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

ठळक मुद्दे३० एप्रिलला तीव्र आंदोलन : पाण्यामुळे चंद्रपूरकरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर ही वेळ आली आहे. मात्र आता नागरिकांचा संयम सुटला आहे. पाणी नाही तर नागरिक करही भरणार नाही, असा इशारा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला.चंद्रपूर हे शांतीप्रिय शहर आहे. याचाच फायदा महानगरपालिका घेत असून आर्थिक जुळवा - जुळव करण्यासाठी उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला हाताशी धरुन शहरात पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. शहरातील अनेक भागात १० दिवसांपासून पाणी पूरवठा ठप्प आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात नागरिकांना उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शहरातील बाबूपेठ, भिवापूर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, घुटकाळा वार्ड, इंदिरा नगर, बालाजी वार्ड, नेहरू नगर, तुकूम, रामनगर, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, म्हाडा कॉलनी या भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. शहराला पाणी पूरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्ज्वल कंन्ट्रक्शनलाही महानगर पालिकेच्या काही मोठया पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने त्याचा मुजोरीपणा कायम आहे, असे जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.एकीकडे नागरिक चरवीभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करीत आहेत तर दुसरीकडे महापालिका सुशोभिकरणाच्या नावावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करीत आहे. अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली असल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे ही पाणी कपात पाणी टंचाईमुळे जाणीवपूर्वक केली जात आहे.येत्या ३० एप्रिलला पाणी द्या अन्यथा खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही जोरगेवार यांनी दिली. पाणी समस्या असलेल्या प्रत्येक प्रभागात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यांच्या भागात पाणी पूरवठा सुरळीत होत नसल्यास तशी लेखी तक्रार यंग चांदा ब्रिगेडकडे द्यावी, असेही जोरगेवार यांनी सांगितले.इरई धरणाची केली पाहणीरविवारी किशोर जोरगेवार यांनी शहराला पाणी पूरवठा करणाºया इरई धरणाची पहाणी केली असता धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून आले. धरणात पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागणे हे नियोजनशून्य कारभारचे लक्षण असून यात मोठे आर्थिक समिकरण जुळविले जात आहे, असा आरोपही किशोर जोरगेवार यांनी केला आहे. पाणी कपातीबाबत मनपा आयुक्त बोलायला तयार नाही. मात्र आमचा संयम आता संपला आहे. आजवर आम्ही पाणी द्या, अशी वारंवार विनंती केली होती. परंतू यापुढे आम्ही विनंती करणार नाही तर आमच्या हक्काचे पाणी हिसकावून मिळवू. या लढाईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला मनपा प्रशासन जवाबदार असेल, असेही जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई