नामांकनाचा पाऊस
By Admin | Updated: February 2, 2017 00:28 IST2017-02-02T00:28:07+5:302017-02-02T00:28:07+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निडणुकीसाठी आज बुधवारी अखेरच्या दिवशी नामांकनाचा अक्षरश: पाऊस पडला.

नामांकनाचा पाऊस
चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निडणुकीसाठी आज बुधवारी अखेरच्या दिवशी नामांकनाचा अक्षरश: पाऊस पडला. जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी तब्बल ४२५ नामांकन दाखल झाले तर, पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६९९ नामांकन सादर झाले. नामांकन परत घेण्याचा अखेरचा दिवस १० फेब्रुवारी असल्याने रिंगणातील खरे चित्र येत्या आठवडाभरातच स्पष्ट होणार आहे.
राजकीय पक्षांनी गेल्या आठवडाभरापासून उमेदरावांच्या याद्या गुलदस्त्यात ठेवलया. मात्र आज नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित उमगदवारांकडे एबी फार्म पोहचविले. दरवर्षीे उमेदवारांच्या याद्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाकडे संबंधित राजकीय पक्षांकडून प्रसिद्धीसाठी पाठविल्या जात असत. मात्र या वेळी केवळ शेतकरी संघटना वगळता कुण्याही पक्षाने उमेदवारांच्या याद्या प्रसिद्धीस दिल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकमेकांची धास्ती घेऊन उमेदवार ठरविणे सुरू असल्याने या वेळी प्रथमच अत्यंत गोपनियपणे उमेदवार ठरविले गेले. तर, काँग्रेसने अगदी अखेरच्या दिवसापर्यंत राष््रवादीसोबत आघाडी करण्याचे सांगत अखेरच्या दिवशी आघाडीचा गेम केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे कार्यकर्तेही वैतागलेले दिसले. काँग्रेसधील गटातटाच्या भांडणांना विराम मिळावा म्हणून विधानसभानिहाय तिकीटवाटपाची जबाबदारी नेत्यांना सोपविण्यात आली होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी वरोरा विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणी आपले उमेदवार लादल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत होती.
दरम्यान, नामांकन दाखल करण्याच्या निमीत्ताने काही ठिकाणी उमेदवारांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर, काही पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जावून नामांकन सादर केले. उमेदवार आणि कार्यकत्यांच्या गर्दीमुळे या वेळच्या निवडणुकीत आज प्रथमच चेतना दिसून आली. असे असले तरी रिंगणात कोणाचे नामंकन कायम राहणार आणि कोणाचे गळणार हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)