आजाराची माहिती कदापि लपवून ठेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:00+5:30

आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.

Never hide illness information | आजाराची माहिती कदापि लपवून ठेऊ नका

आजाराची माहिती कदापि लपवून ठेऊ नका

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : २१४ वाहने ताब्यात, ३५ अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटीव्ह रूग्ण नाही. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नका, रूग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही असे आठवडाभराचे नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.
नवीन आदेशानुसार केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीमध्ये भाजीपाला, किराणा सामान, दूध, ब्रेड, अंडी, मांस, मासोळी, बेकरी, पशुखाद्याची दुकाने, सिलिंडर पुरवठा करणारी यंत्रणा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. या काळात अन्य कोणतीही व्यापारी प्रतिष्ठान सुरू करण्यास मज्जाव आहे. इलेक्ट्रीकल व अत्यावश्यक दुरूस्तीसंदर्भात कारागिरांनी घरी जाऊन सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

परराज्यातील १० हजार ९९४ नागरिक निगरानीत
जिल्ह्यामध्ये विदेशातून आलेल्या एकाही नागरिकांची तपासणी शिल्लक नाही. २०४ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकाही नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह नाही. जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार २६ नागरिकांची नोंद झाली. यापैकी १० हजार ९९४ नागरिक सध्या निगराणीत आहे.याशिवाय १४ दिवस होम क्वारंटाईन झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ३२ आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रुग्णांची संख्या २० आहे.

श्यामनगरातील रास्तभाव दुकान सील
चंद्रपूर : शहरातील श्यामनगर येथील जीवन विकास कल्याण संस्थेद्वारे संचालित रास्त भाव दुकानदार सविता सपना राय यांनी कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत शिधात्रिकाधारकांना निर्धारीत वाटप परिमाणापेक्षा कमी धान्य दिल्याने बुधवारी पुरवठा विभागाने दुकानाला सील ठोकले.

अनावश्यक बँक व्यवहार टाळा
बँकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे मंगळवारी दिसून आले. त्यामुळे आवश्यकता नसताना बँकेचा व्यवहार टाळण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. फारच गरज असेल तर सामाजिक दुरी राखून व्यवहार करावा. गंजवार्डातील भाजीपाला बाजाराला कोहिनूर मैदानामध्ये सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची विक्री आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर हात धुण्याची व सॅनीटायझरची व्यवस्था करावी, असेही स्पष्ट केले.

Web Title: Never hide illness information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.