शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:10 IST

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हाधिकारी कार्यालयात जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक ए. व्ही. भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, फरदड कापूसमुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहभागी व्हावे. मोहिमेचे स्वरूप व्यापक करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पदाधिकाºयांनी सहभागी करून अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्याविरूद्ध जागृती केल्याने शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाददिला. यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये शेतकºयांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी यंत्राच्या अनुदानासाठी १५ जानेवारी २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूसमुक्त गाव अभियान विषयावरील भित्तीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.बोंडअळीच्या उच्चाटणासाठी उपायपीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटी व व्यवस्थित न उपडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पालापाचोडा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनिंग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. कपाशीच्या पऱ्हाठीत सुप्त अवस्थेत बोंडअळी राहते. ही पऱ्हाठी गंजी करुन बांधावर ठेवू नये. त्या पिकाचा चुरा करण्यासाठी ग्रेडर यंत्राचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.