शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:10 IST

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हाधिकारी कार्यालयात जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक ए. व्ही. भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, फरदड कापूसमुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहभागी व्हावे. मोहिमेचे स्वरूप व्यापक करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पदाधिकाºयांनी सहभागी करून अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्याविरूद्ध जागृती केल्याने शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाददिला. यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये शेतकºयांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी यंत्राच्या अनुदानासाठी १५ जानेवारी २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूसमुक्त गाव अभियान विषयावरील भित्तीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.बोंडअळीच्या उच्चाटणासाठी उपायपीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटी व व्यवस्थित न उपडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पालापाचोडा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनिंग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. कपाशीच्या पऱ्हाठीत सुप्त अवस्थेत बोंडअळी राहते. ही पऱ्हाठी गंजी करुन बांधावर ठेवू नये. त्या पिकाचा चुरा करण्यासाठी ग्रेडर यंत्राचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.