शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:10 IST

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हाधिकारी कार्यालयात जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक ए. व्ही. भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, फरदड कापूसमुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहभागी व्हावे. मोहिमेचे स्वरूप व्यापक करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पदाधिकाºयांनी सहभागी करून अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्याविरूद्ध जागृती केल्याने शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाददिला. यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये शेतकºयांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी यंत्राच्या अनुदानासाठी १५ जानेवारी २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूसमुक्त गाव अभियान विषयावरील भित्तीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.बोंडअळीच्या उच्चाटणासाठी उपायपीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटी व व्यवस्थित न उपडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पालापाचोडा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनिंग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. कपाशीच्या पऱ्हाठीत सुप्त अवस्थेत बोंडअळी राहते. ही पऱ्हाठी गंजी करुन बांधावर ठेवू नये. त्या पिकाचा चुरा करण्यासाठी ग्रेडर यंत्राचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.