शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बंधाऱ्यांमधील गाळ उपसण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:18 AM

शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळावे, याकरिता शासनाने जिल्ह्यात शेकडो बंधारे बांधले. पण, यामध्ये गाळ साचल्याने खरीप पिके वाया जाण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : अन्यथा खरीप हंगामातील पिके वाया जाण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामातील पिकांना पुरेसे पाणी मिळावे, याकरिता शासनाने जिल्ह्यात शेकडो बंधारे बांधले. पण, यामध्ये गाळ साचल्याने खरीप पिके वाया जाण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.पिके वाचविण्यासाठी शेतकरी आपापल्या शक्तीप्रमाणे प्रयत्न करतात. पण, शेताजवळ असलेल्या बंधाºयाचाही मोठा उपयोग होतो. विविध योजनेअंतर्गत सर्वच तालुक्यात शेकडो बंधारे बांधण्यात आले. यातील अनेक बंधारे शेतकऱ्यांनी संजीवनी दिली. सद्यस्थितीत या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे खरीप हंगामात पावसाळ्यातील पाणी साचणार की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आता तर जलस्रोत आटल्याने शिवारातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी बहुतांश रब्बी पिके सुकत आहेत.या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सिंचन विभागाने विदर्भ सधन सिंचन अभियानांतर्गत सिंचन व साठवण बंधारे बांधण्यात आले. या बंधाºयांवर कोट्यधींचा खर्च झाला. पण, बºयाच बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्याने हा खर्च वाया गेल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. बंधाºयांमध्ये मूबलक जलसाठा असल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु, जिल्ह्यातील वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. सन २०१६-१७ मध्ये या कामांवर कोट्यवधी रूपये खर्च झाले. या बंधाऱ्यांमध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता संपली.मागील वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस मोठ्या प्रमाणात लावला. पाण्याअभावी कपासीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला पिकविता आला नाही. सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. आता दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. यंदा पाऊस कमी पडल्यास जिल्ह्यातील शेकडो बंधारे बिनकामी ठरण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.विहिरींनी गाठला तळविविध योजनांद्वारे जिल्ह्यात शेकडो विहिरी खोदण्यात आल्या. यातील अनेक विहिरी अर्धवट आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावल्याने विहिरींनी तळ गाठला. जलयुक्त शिवार अभियानदरम्यान केलेली सिंचनाची विविध कामे शेतातील विहिरींचा जलसाठा वाढविण्यास मदत करतील असे वाटत होते. पण, ही योजना केवळ पावसावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात शेतकºयांच्या मदतीला येऊ शकली नाही. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शासनाने विशेष काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई