शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:22 IST

जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष :पावसाळ्यात गावाचा तुटतो संपर्क

संघरक्षित तावाडे।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.पाटागुडा गाव शंभर टक्के आदिवासी असून या गावात शासनाच्या योजना पोहचल्याच नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्यांनी एकप्रकारे गावाला वेढलेले दिसून येते. या गावात जातो म्हटले तर पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जाणाऱ्या रस्त्यावर छोटे - छोटे नाले असून आजही नाल्यातून पाणी वाहत आहे.एवढेच नाही तर पावसाळ्यात या गावाचाच संपर्क तुटतो, ही वास्तविकता आहे. गावाच्या बाहेर लागूनच एक विहीर आहे. पण पाणी मात्र गढूळ आहे. यात ब्लिचींग पावडरसुद्धा टाकत नसून याच खराब पाण्यावर गावकºयांना तहान भागवावी लागत असल्याचे गावकºयांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. गावात आरोग्य सेवक आरोग्याची तपासणी करायला येत नाही. एवढेच काय तर पावसाच्या दिवसात गावात आरोग्याची तसेच रूग्णाची बिकट परिस्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.गावाला रस्ता नसल्याने आमच्या लहान - लहान मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेरगावला शाळेत शिकायला ठेवावे लागते, अशी खंतही गावकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.धणकदेवी ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी याच अंतर्गत येणाऱ्या पाटागुड्यात मात्र समस्या पाहायला मिळतात. आॅगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत या गावासाठी रस्त्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे कळले. या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य अनिता सुग्रिव गोतावळे यांनी पाटागुडा गावासाठी दीड किमी रस्ता बांधकामासाठी सतत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.परंतु, निधीची उपलब्धता नसल्याचे कारण सांगत आजपर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही. एकंदरीत निसर्गाने नटलेले हे गाव समस्येने वेढले आहे, असेच म्हणावे लागेल.चिमुकल्यांच्या शिक्षणाची काळजी कोण घेणार?गावात शाळा नसली तरी मुलांना जवळच्या गावात जाऊन शिकायला पाठवितो म्हटल्यास चांगला रस्ता नाही. रस्त्यावरून पावसाच्या दिवसात पाणी वाहत असते. मग मुलांना कसे पाठवावे, हा पालकांचा प्रश्न आहे. शासन शिक्षणावर भर देत असले तरी पाटागुड्यासारख्या गावातील आदिवासी चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न पडतो. प्राथमिक शिक्षणापासूनच चिमुकल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे.गावात अनेक समस्या असून यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याची समस्या मुख्य असून ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने पावले उचलावी.-अविनाश मडावी, ग्रामस्थ, पाटागुडा