शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:22 IST

जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष :पावसाळ्यात गावाचा तुटतो संपर्क

संघरक्षित तावाडे।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.पाटागुडा गाव शंभर टक्के आदिवासी असून या गावात शासनाच्या योजना पोहचल्याच नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्यांनी एकप्रकारे गावाला वेढलेले दिसून येते. या गावात जातो म्हटले तर पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जाणाऱ्या रस्त्यावर छोटे - छोटे नाले असून आजही नाल्यातून पाणी वाहत आहे.एवढेच नाही तर पावसाळ्यात या गावाचाच संपर्क तुटतो, ही वास्तविकता आहे. गावाच्या बाहेर लागूनच एक विहीर आहे. पण पाणी मात्र गढूळ आहे. यात ब्लिचींग पावडरसुद्धा टाकत नसून याच खराब पाण्यावर गावकºयांना तहान भागवावी लागत असल्याचे गावकºयांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. गावात आरोग्य सेवक आरोग्याची तपासणी करायला येत नाही. एवढेच काय तर पावसाच्या दिवसात गावात आरोग्याची तसेच रूग्णाची बिकट परिस्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.गावाला रस्ता नसल्याने आमच्या लहान - लहान मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेरगावला शाळेत शिकायला ठेवावे लागते, अशी खंतही गावकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.धणकदेवी ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी याच अंतर्गत येणाऱ्या पाटागुड्यात मात्र समस्या पाहायला मिळतात. आॅगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत या गावासाठी रस्त्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे कळले. या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य अनिता सुग्रिव गोतावळे यांनी पाटागुडा गावासाठी दीड किमी रस्ता बांधकामासाठी सतत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.परंतु, निधीची उपलब्धता नसल्याचे कारण सांगत आजपर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही. एकंदरीत निसर्गाने नटलेले हे गाव समस्येने वेढले आहे, असेच म्हणावे लागेल.चिमुकल्यांच्या शिक्षणाची काळजी कोण घेणार?गावात शाळा नसली तरी मुलांना जवळच्या गावात जाऊन शिकायला पाठवितो म्हटल्यास चांगला रस्ता नाही. रस्त्यावरून पावसाच्या दिवसात पाणी वाहत असते. मग मुलांना कसे पाठवावे, हा पालकांचा प्रश्न आहे. शासन शिक्षणावर भर देत असले तरी पाटागुड्यासारख्या गावातील आदिवासी चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न पडतो. प्राथमिक शिक्षणापासूनच चिमुकल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे.गावात अनेक समस्या असून यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याची समस्या मुख्य असून ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने पावले उचलावी.-अविनाश मडावी, ग्रामस्थ, पाटागुडा