शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सातबारावरून नावे केली गहाळ

By admin | Updated: July 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे

मोहाळी (नलेश्वर) : नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारावरून कोणत्याही प्रकारची वाटणी व संमतीपत्र न घेता इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून नावे गायब केली. मंडळ अधिकरी व तलाठ्याच्या या प्रतापाने ईश्वर रंदये या शेतकऱ्याला वडिलोपार्जित व हक्काच्या शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. २५ वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवून ईश्वर रंदये याला अद्यापही न्याय मिळाला नाही. सोनापूर प.ह.नं. १८ गोविंदपूर येथील जुना गट नं. १४८/१ आराजी ५.६७ हेक्टर आर. भोगवट वर्ग २ ची धानारी शेतजमीन अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर डोमाजी रंदये व इतर हिस्सेदार कैलाश नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये व विठोबा रामदास रंदये या सर्वांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. २५ वर्षापूर्वी इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून ईश्वर रंदये यांचे नाव सातबारावरून केले. वास्तविक नविन सातबारा फेरफार करताना संबंधित हिस्सेदाराचे संमतीपत्र व वाटणीपत्र आवश्यक आहे. असे असताना ईतर हिस्सेदारांनी २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून हा गैरव्यवहार केला.मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या या प्रतापाने ेईश्वर रंदये या शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या साडेतीन एकर शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. ही शेतजमीन मिळावी म्हणून हा अन्यायग्रस्त शेतकरी २५ वर्षांपासून सातत्याने तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवूनही त्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळावा व हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून त्याचा संघर्ष सुरूच आहे. (वार्ताहर)सर्व नियम धाब्यावरसातबारावरील नाव कमी करण्यासाठी व फेरफार करण्यासाठी वारसांंकडून किंवा संबंधितांकडून संमतीपत्र मिळत नाही, तोपर्यंत महसूल विभागाला सातबारावरून कोणाचेही नावे कमी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सातबारावरून नावे कमी करण्याचा अधिकार मागणीनुसार संबंधिताचे संमतीपत्र किंवा मृत्युपश्चात सरपंचाचे वारसान प्रमाणपत्र, पोलीस पाटलाचे वारसान प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवाची स्वाक्षरी असलेला मृत्यू दाखला व १०० रुपयाच्या शपथपत्रावर वारसा हक्क असल्याचे सिद्ध करावे लागते. यानंतरही महसूल विभागाला त्या संदर्भात कुणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास मुदतपूर्व जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागतो. ठरलेल्या मुदतीत कुणाचे आक्षेप किंवा हरकत नसल्यास सातबारावर वारसानाचे नावे चढवून सातबारा फेरफार करण्यात येत असतो. मात्र येथे २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव गहाळ केल्याचा प्रताप केलेला आहे.शेतजमीन विकलीइतर हिस्सेदार कैलास नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये, विठोबा सोमा रंदये यांनी अन्यायग्रस्त शेतकरी इश्वर डोमा रंदये यांची शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने नाव गायब केली व तीच शेतजमीन नविन गट नं. १४८/२ शंकर गणपत भरडे रा. सोनापूर व नवीन गट नं. १४८/४ राधाबाई विनायक नन्नावरे यांना परस्पर विकून नवीन सातबारा तयार केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर रंदये यांनी केला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची पूर्णत: चौकशी करून न्याय देण्याची मागणी केलेली आहे.