शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सातबारावरून नावे केली गहाळ

By admin | Updated: July 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे

मोहाळी (नलेश्वर) : नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारावरून कोणत्याही प्रकारची वाटणी व संमतीपत्र न घेता इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून नावे गायब केली. मंडळ अधिकरी व तलाठ्याच्या या प्रतापाने ईश्वर रंदये या शेतकऱ्याला वडिलोपार्जित व हक्काच्या शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. २५ वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवून ईश्वर रंदये याला अद्यापही न्याय मिळाला नाही. सोनापूर प.ह.नं. १८ गोविंदपूर येथील जुना गट नं. १४८/१ आराजी ५.६७ हेक्टर आर. भोगवट वर्ग २ ची धानारी शेतजमीन अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर डोमाजी रंदये व इतर हिस्सेदार कैलाश नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये व विठोबा रामदास रंदये या सर्वांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. २५ वर्षापूर्वी इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून ईश्वर रंदये यांचे नाव सातबारावरून केले. वास्तविक नविन सातबारा फेरफार करताना संबंधित हिस्सेदाराचे संमतीपत्र व वाटणीपत्र आवश्यक आहे. असे असताना ईतर हिस्सेदारांनी २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून हा गैरव्यवहार केला.मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या या प्रतापाने ेईश्वर रंदये या शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या साडेतीन एकर शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. ही शेतजमीन मिळावी म्हणून हा अन्यायग्रस्त शेतकरी २५ वर्षांपासून सातत्याने तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवूनही त्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळावा व हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून त्याचा संघर्ष सुरूच आहे. (वार्ताहर)सर्व नियम धाब्यावरसातबारावरील नाव कमी करण्यासाठी व फेरफार करण्यासाठी वारसांंकडून किंवा संबंधितांकडून संमतीपत्र मिळत नाही, तोपर्यंत महसूल विभागाला सातबारावरून कोणाचेही नावे कमी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सातबारावरून नावे कमी करण्याचा अधिकार मागणीनुसार संबंधिताचे संमतीपत्र किंवा मृत्युपश्चात सरपंचाचे वारसान प्रमाणपत्र, पोलीस पाटलाचे वारसान प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवाची स्वाक्षरी असलेला मृत्यू दाखला व १०० रुपयाच्या शपथपत्रावर वारसा हक्क असल्याचे सिद्ध करावे लागते. यानंतरही महसूल विभागाला त्या संदर्भात कुणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास मुदतपूर्व जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागतो. ठरलेल्या मुदतीत कुणाचे आक्षेप किंवा हरकत नसल्यास सातबारावर वारसानाचे नावे चढवून सातबारा फेरफार करण्यात येत असतो. मात्र येथे २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव गहाळ केल्याचा प्रताप केलेला आहे.शेतजमीन विकलीइतर हिस्सेदार कैलास नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये, विठोबा सोमा रंदये यांनी अन्यायग्रस्त शेतकरी इश्वर डोमा रंदये यांची शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने नाव गायब केली व तीच शेतजमीन नविन गट नं. १४८/२ शंकर गणपत भरडे रा. सोनापूर व नवीन गट नं. १४८/४ राधाबाई विनायक नन्नावरे यांना परस्पर विकून नवीन सातबारा तयार केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर रंदये यांनी केला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची पूर्णत: चौकशी करून न्याय देण्याची मागणी केलेली आहे.