शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते.

ठळक मुद्देसंपर्कातील अडथळे होणार दूर : एफटीटीएच सेवा देण्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आले. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायतींना जोडण्याचे काम केले जात आहे.भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल्ह्यात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते. परंतु, सध्या केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. जिल्ह्याचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. बीएसएनएलचे राज्यात पाच हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये एक लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर तीन हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची ३ जी सेवा चंद्रपूर, मूल, ब्रह्मपूरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर व गडचांदूर येथे सुरू करण्यात आली. ही सेवा चिमूर, नागभीड, गोंडपिपरी, सिंदेवाही व राजुरा येथही सुरू लवकरच होणार आहे. नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्ह्यातील ३२४ ग्रा. पं. जोडल्या आहेत. उर्वरित ५०५ ग्रा. पं. ला जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. एफटीटीएच सेवेसाठी चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर असणाºया पूणे जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन तर जिल्ह्यात ६५० च्या सुमारे कनेक्शन आहेत. इतरत्र बीएसएनएल असअतानाच गडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएल फायद्यात आहे, अशीही माहिती महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली. गडचिरोलीत तीन लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्यांच्या पाठोपाठ चार हजार लॅन्ड लाईन तर १२०० ब्रॅन्डबँड कनेक्शन आहेत. महिन्याला एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे.लोकाभिमुख सेवेला प्राधान्यदूरसंचार क्षेत्रात मागील दहा वर्षांत खासगी कंपन्यांनी शिरकाव केला. याकरिता केंद्र सरकारचेच धोरण कारणीभुत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांना लोकाभिमुख सेवा देण्यासाठी दुरसंचार विभागाने पाऊल उचलले. एफटीटीएच सेवा लवकरच सुरू आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत