शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:38 IST

‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’च्या घोषणा देत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या अनेक विभागात विविध पदे रिक्त असतानाही शासन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यास तयार नाही.

ठळक मुद्देसुशिक्षित बेरोजगारांचा सरकारवर रोष : शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘मायबाप म्हणते शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’च्या घोषणा देत चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाच्या अनेक विभागात विविध पदे रिक्त असतानाही शासन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यास तयार नाही. केवळ कंत्राटी पदभरती राबवून शासन सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करीत आहे. पोलीस भरतीमध्ये निवृत्त कोटा व प्रचलीत कोटा शंभर टक्के राबविण्याच्या प्रमुख मागणीसह एकूण १९ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सुशिक्षित बेरोजगार सहभागी झाले होते.गांधी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शासन विरोधात घोषणा देत मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मुख्यमंत्र्यांनी १२ हजार जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये पाच हजार ९५७ जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात नोकर भरती राबविण्याचे आश्वासन दिले. मात्र नोकरभरती प्रक्रिया अजूनही राबविली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकार बेरोजगारी दूर करण्यासाठी पकोडे विका, असा सल्ला देत आहे. मात्र सर्वच सुशिक्षित बेरोजगार पकोडो विकले तर खाणार कोण, असा प्रश्नही बेरोजगारांनी यावेळी केला. दरम्यान एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.देखाव्याने वेधले लक्षमोर्चादरम्यान अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलींनी स्कॉलर कोट घालून डिग्री तर आहे, मात्र नोकरी नाही. त्यामुळे मानसिक विवंचनेत बेरोजगार गळफास घेवून आत्महत्या करीत असल्याचे देखावे केले. हे देखावे लक्ष वेधून घेत होते. तर एका ट्रॉलीवर स्कॉलर कोट घालून पकोडे विकत असल्याचे दाखविण्यात आले.एक मोर्चेकरी पडला बेशुद्धगांधी चौकातून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शासनविरोधात घोषणा देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीकांत साव नामक सुशिक्षित बेरोजगार युवक अचानक बेशुद्ध पडला. त्याला रूग्णालयात हलविण्यात आले.या आहेत मागण्याचंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीसाठी केवळ ६२ जागा काढण्यात आल्या असून त्या जागा वाढवून २५० जागांसाठी भरती घ्यावी, कंत्राटी पद्धतीने शासकीय जागा भरण्यावर बंदी घालावी, राज्यसेवा परीक्षा पदांच्या संख्येत वाढ करावी, जिल्हा भरती नियमीतपणे घ्यावी, परीक्षांचे शुल्क कमी करावे, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, परीक्षा स्थळ जिल्हा मुख्यालय ठेवावे, एमपीएससी पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करावी, विदर्भातील अनुषेश जाहीर करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची शासनाने तत्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली.