शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने नाकारले दोन हजार लेआऊट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:43 IST

महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीच्या कागदपत्रांसह भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनी त्रुटींची पुर्तता न केल्याने दोन हजार ११६ प्रकरणांना महानगर पालिकेने नाकारले आहे.

ठळक मुद्देगुंठेवारी निकषात बाद : दोन हजार ११६ पैकी ३८१ प्रकरणांवरच होणार सुनावणी

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीच्या कागदपत्रांसह भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज सादर करणाऱ्या नागरिकांनी त्रुटींची पुर्तता न केल्याने दोन हजार ११६ प्रकरणांना महानगर पालिकेने नाकारले आहे. तर, केवळ ३८१ पात्र प्रकरणांवर येत्या ९ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे. उर्वरित सर्व अर्जदारांचे लेआऊट्स विकास प्रकल्पांना बाधा आणत असल्याच्या कारणावरून फेटाळले आहे.चंद्रपूर शहरातील २ हजार ११६ भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी महानगर पालिकेत अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये गुंठेवारी कायद्याच्या निकषात न बसणाऱ्या प्रकरणांचीच संख्या अधिक असल्याने दोन हजार भूखंडधारकांचे अर्ज फेटाळण्याची टांगती तलवार कायम असल्याचे भाकित ‘लोकमत’ वर्तविले होते. चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांत आरक्षित जागांवर घरे बांधून निवास करणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच आहे. मनपाकडून गृहकर आकारला जात असला, तरी संबंधित भुखंड आणि इमारतींचे अद्याप नियमितीकरण झाले नाही. राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम २००१ नुसार २००१ पूर्वीची कागदपत्रे असलेल्या सर्व भूखंडधारकांचे नियमितीकरण करण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिकेनेही संबंधित भूखंडधारकांकडून विहित प्रपत्रात अर्ज मागविले होते. शहरातील २ हजार ४९७ भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी मनपाकडे अर्ज केले. त्यापैकी ३८१ प्रकरणे गुंठेवारी कायद्यानुसार शहर विकास योजनेला अनुरुप ठरलीत. उर्वरीत २ हजार ११६ प्रकरणे कायद्याच्या निकषांना ठेंगा दाखविणारी होती. त्यामुळे विहित मुदतीत त्रुटी पूर्ण करा, अशी नोटीस भूखंडधारकांना मनपाने पाठविली होती. भूखंडाचे नियमितीकरणासाठी मनपाकडे आलेली तब्बल २ हजार ११६ प्रकरणे शहर विकास योजनेला बाधा आणणारी म्हणजे गुंठेवारी कायद्याच्या निकषात बसणारी नसल्याने भूखंडधारकांचे दावे फेटाळले आहे.काय आहेत कारणे ?भूखंडातील आरक्षित जागेवर अतिक्रमण, आवश्यक रुंदीचा रस्ता न सोडणे, रेल्वेलाईन बासपास रस्ता, परावर्तीत प्लॉट, म्हाडाच्या भूसंपादीत क्षेत्रात घर उभारणे, नझुल शिट भूखंड, खेळाचे मैदान बळकावणे, आवश्यक रुंदीचा रस्ता नसणे, कोळसा व्याप्त क्षेत्रात घर बांधणे, आदी बेकायदेशीर प्रकरणांना महाराष्ट्र गुंठेवारी कायद्यातील निकषाने चपराक लावली आहे.‘त्या’ अर्जांचे काय होणार ?ले-आऊट मंजूर असूनही ज्या भूखंडधारकांकडे २००१ नंतरची रजिस्ट्री आहे. अशांना गुंठेवारी कायद्यानुसार यापूर्वी नियमितीकरणाचा लाभ घेता येत होता. नव्या निर्णयानुसार आता २००१ पूवी मंजूर ले-आऊट आणि रजिस्ट्री २००१ नंतर असलेले भूखंड नियमित करता येते. चंद्रपूर शहरातील पूरबाधित क्षेत्रातून (आरक्षित) २०० भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी अर्ज सादर केले. मात्र, राज्य शासनाने आरक्षण उठविले नाही, तर अर्जदारांचा अपेक्षाभंग होणार आहे.