मनपाने केले ५०९ नागरिकांना स्वगावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:43+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते.

Muncipal Corporation deported 509 citizens | मनपाने केले ५०९ नागरिकांना स्वगावी रवाना

मनपाने केले ५०९ नागरिकांना स्वगावी रवाना

ठळक मुद्देदीड महिन्यापासून १७ निवारा केंद्रात केली व्यवस्था । अखेर मजुरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर शहरात अडकलेल्या एकूण ५०९ परराज्यातील कामगारांची आतापर्यंत त्यांच्या राज्यात पाठवणी केली असून शनिवारी छत्तीसगड राज्यातील ३८ व मध्य प्रदेशातील ३७ असे एकूण ७५ नागरिक मनपाच्या विशेष वाहनाने त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. मनपातर्फे सर्वांची खाण्याची व वैद्यकीय तपासणीची सोय करुन सर्वांना खासगी बस व इतर गाडयांमधून त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी रवाना केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते. तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ अशा विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, अकोला, लातूर, वर्धा, नांदेड, भंडारा, यवतमाळ या विविध शहरातील मजूर, कामगार, विद्यार्थी चंद्रपूर शहरात अडकले होते. मे महिन्यापासून मनपाच्या निवारा केंद्रांमध्ये थांबलेल्या या नागरिकांची निवास, भोजन व आरोग्य व्यवस्था मनपा प्रशासनद्वारे करण्यात येत होती. गेल्या दीड महिन्यात लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही. कुटुंब गावी या द्विधा मनस्थितीत नागरिक आणि मजूर अडकलेले होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाने अखेर सर्व प्रक्रिया करून या मजूर, नागरिकांना त्यांच्या गावी वाहनांनी पाठवण्याचा निर्णय घेतला. ७५ प्रवाशी शनिवारी रवाना करण्यात आले. महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामगारांसाठी गावी जाताना भाजी-पोळी, पिण्याचे पाणी इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार यांच्या नेतृत्वात विशेष आरोग्य पथकांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
गडचांदूरातून ४८ परप्रांतीय रवाना
गडचांदूर : येथील ३५ व कोरपना तालुक्यातील १३ असे एकूण ४८ जण नागरिकांना शनिवारी पालिका प्रशासनाने माणिकगढ सिमेंट कंपनीच्या बसने लखनऊ येथे रवाना केले.

Web Title: Muncipal Corporation deported 509 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.