शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

एमपीएससीचा अघोषित धक्का ! फक्त दोन दिवस आधी परीक्षेची नोटिफिकेशन

By परिमल डोहणे | Updated: August 13, 2025 17:30 IST

हजारो उमेदवारांची स्वप्ने चुरगाळली : परीक्षेला दोन दिवस असताना जाहीर केले वेळापत्रक

चंद्रपूर : सरकारी नोकरीचे स्वप्न डोळ्यांत ठेवून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या उमेदवारांवराची एमपीएससीने जणू चेष्टा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील गट-अ संवर्गातील पदभरतीची परीक्षा केवळ दोन दिवस आधी जाहीर करून उमेदवारांना अक्षरशः धावपळीत ढकलले. १३ ऑगस्ट २०२५ ला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले असताना याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली. त्यामुळे दोन दिवसांत रिझर्व्हेशन करायचे कसे, जायचे कसे, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला. अनेकांना तर हॉलतिकीट काढून जाणे शक्यच झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत उपसंचालक तंत्र शिक्षण, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरतीकरिता आयोगामार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. २३ जुलै २०२५ च्या शुद्धिपत्रकानुसार २४ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान उमेदवारांना अर्ज करण्यास पुन्हा संधी दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नव्या जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान तब्बल दोन वर्षे कोणत्याही प्रकारची अधिसूचना न काढता ११ ऑगस्ट २०२५ ला अधिसूचना काढून १३ ऑगस्टला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले. मात्र, या परीक्षेला विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील पात्रताधारकांना वेळेवर मुंबईला पोहोचणे शक्य नव्हते. परिणामी, अनेक जण परीक्षेपासून वंचित राहिले.

अनेक जण परीक्षेपासून वंचित

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया विदर्भातील या जिल्ह्यातील तरुणांना मुंबई जाण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात सोय नाही. एक- दोन रेल्वे आहेत. मात्र, सण-उत्सवामुळे त्यांचे रिझर्व्हेशन फुल झाले आहे. अशातच १३ ला परीक्षा असताना ११ नोटिफिकेशन आले. त्यामुळे काहींनी ११ ऑगस्टला, काहींनी १२ ऑगस्टला हॉलतिकीट काढले. मात्र, दुसऱ्या दिवशीच पेपर असल्याने जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. विमानाने जाणे परवडणारे नसल्याने अनेकांनी परीक्षाच दिली नाही. 

पुन्हा परीक्षा घेण्याची मागणीऐन वेळेस परीक्षा जाहीर केल्याने दूरवरील गावातील तरुणांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे आजपर्यंतचे बघितलेले स्वप्न भंग पावले आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

"मी अर्ज करून परीक्षेची तयारीसुद्धा केली होती. एमपीएससीने १३ ऑगस्टला परीक्षा जाहीर केली व त्याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट रोजी साइटवर पब्लिश केली. एवढ्या कमी कालावधीत मी मुंबईला पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शासनाने पुन्हा परीक्षा घेऊन जे वंचित आहेत, त्यांना न्याय द्यावा."

- मनोज बसेशंकर, चंद्रपूर

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाchandrapur-acचंद्रपूर