शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचा अघोषित धक्का ! फक्त दोन दिवस आधी परीक्षेची नोटिफिकेशन

By परिमल डोहणे | Updated: August 13, 2025 17:30 IST

हजारो उमेदवारांची स्वप्ने चुरगाळली : परीक्षेला दोन दिवस असताना जाहीर केले वेळापत्रक

चंद्रपूर : सरकारी नोकरीचे स्वप्न डोळ्यांत ठेवून वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या उमेदवारांवराची एमपीएससीने जणू चेष्टा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील गट-अ संवर्गातील पदभरतीची परीक्षा केवळ दोन दिवस आधी जाहीर करून उमेदवारांना अक्षरशः धावपळीत ढकलले. १३ ऑगस्ट २०२५ ला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले असताना याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली. त्यामुळे दोन दिवसांत रिझर्व्हेशन करायचे कसे, जायचे कसे, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला. अनेकांना तर हॉलतिकीट काढून जाणे शक्यच झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत उपसंचालक तंत्र शिक्षण, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरतीकरिता आयोगामार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. २३ जुलै २०२५ च्या शुद्धिपत्रकानुसार २४ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान उमेदवारांना अर्ज करण्यास पुन्हा संधी दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नव्या जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान तब्बल दोन वर्षे कोणत्याही प्रकारची अधिसूचना न काढता ११ ऑगस्ट २०२५ ला अधिसूचना काढून १३ ऑगस्टला मुंबई येथे परीक्षेचे नियोजन केले. मात्र, या परीक्षेला विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांतील पात्रताधारकांना वेळेवर मुंबईला पोहोचणे शक्य नव्हते. परिणामी, अनेक जण परीक्षेपासून वंचित राहिले.

अनेक जण परीक्षेपासून वंचित

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया विदर्भातील या जिल्ह्यातील तरुणांना मुंबई जाण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात सोय नाही. एक- दोन रेल्वे आहेत. मात्र, सण-उत्सवामुळे त्यांचे रिझर्व्हेशन फुल झाले आहे. अशातच १३ ला परीक्षा असताना ११ नोटिफिकेशन आले. त्यामुळे काहींनी ११ ऑगस्टला, काहींनी १२ ऑगस्टला हॉलतिकीट काढले. मात्र, दुसऱ्या दिवशीच पेपर असल्याने जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला. विमानाने जाणे परवडणारे नसल्याने अनेकांनी परीक्षाच दिली नाही. 

पुन्हा परीक्षा घेण्याची मागणीऐन वेळेस परीक्षा जाहीर केल्याने दूरवरील गावातील तरुणांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे आजपर्यंतचे बघितलेले स्वप्न भंग पावले आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

"मी अर्ज करून परीक्षेची तयारीसुद्धा केली होती. एमपीएससीने १३ ऑगस्टला परीक्षा जाहीर केली व त्याबाबतची अधिसूचना ११ ऑगस्ट रोजी साइटवर पब्लिश केली. एवढ्या कमी कालावधीत मी मुंबईला पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शासनाने पुन्हा परीक्षा घेऊन जे वंचित आहेत, त्यांना न्याय द्यावा."

- मनोज बसेशंकर, चंद्रपूर

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाchandrapur-acचंद्रपूर