शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या पार्थिवाला मुलींनीच दिला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही.

ठळक मुद्देरुढी परंपरेला फाटा देत पार पाडले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथील सुमित्राबाई शामराव साळवे (८०) यांचा शनिवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. संपूर्ण आयुष्य आईने मायेची उब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणही खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली. आणि तिच्या भावाने रुढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली. सोबतच आईच्या पार्थिवाला भडाग्नीदेखील मुलीनेच दिला.मृतक सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षांपासून सक्रिय कार्य करीत आहे. अनेक पदाची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आहे. चळवळीत कार्य करीत असल्यामुळे कोणतेही चांगले काम करण्याची सवय लागते आणि त्यातून चांगले काय, वाईट काय समजण्यास वाव मिळतो. हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही. ते अपवित्र समजले जाते. परंतु सुमित्राबाई यांचा मुलगा संभाजी साळवे हे पुरोगामी विचारांचे वाहक असल्यामुळे त्यांनी आपल्या आईच्या तिरडीला मुलगी मिना कातकडे व कवडुबाई धानोरकर तसेच सुनबाई विना साळवे व सविता साळवे यांना खांदा देण्यास सहमती दर्शवून महिलांनाही अंत्यसंस्कारात स्थान दिले. यावेळी संभाजी साळवे व मारोती साळवे या दोन मुलासह, मुलगी व सुनेनेसुद्धा सुमित्राबाईच्या पार्थिवाला खांदा देऊन चितेला भडाग्नी दिला. त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला. जेवढा हक्क आईच्या, वडिलाच्या तिरडीला खांदा देण्याचा मुलाचा आहे, तेवढाच मुलीचासुद्धा आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.साळवे परिवाराने २०१९ मध्ये आपल्या वडिलांचा अंतिमसंस्कार सुद्धा याच पद्धतीने केला होता. समाजाने सुद्धा याच पद्धतीने अंतिम संस्कार करून मनात असलेली भीती घालवावी. तसेच मुलगा आणि मुलगी यात भेद न पाळता समाजात आदर्श निर्माण करावा, असे संभाजी साळवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यू