शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

२00९ मध्ये जाळले सर्वाधिक वाहने

By admin | Updated: May 10, 2014 00:27 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते. हे वर्ष पोलीस दलासाठीही काळ वर्षच ठरले होते.१९८९ मध्ये नक्षल्यांनी ३ ट्रक, २ ट्रॅक्टर व एक मेटॅडोर अशी सहा वाहनांची जाळपोळ करून १४ लक्ष ६४ हजार ८६६ रुपयांचे नुकसान केले. १९९0 मध्ये १९ लक्ष ६५ हजार रुपयांची ९ वाहने, १९९१ मध्ये १७ लक्ष ४१ हजार रुपयांची ९ वाहने, १९९२ मध्ये २५ लक्ष २ हजार रुपयांची ९ वाहने, १९९३ मध्ये १४ लक्ष ५७ हजार रुपयांची १३ वाहने, १९९४ मध्ये ४२ लक्ष ७५ हजार रुपयांची १९ वाहने, १९९५ मध्ये ३ लक्ष रुपयांचा एक ट्रक, १९९६ मध्ये ६७ लक्ष ९0 हजार ६00 रुपयांची १८ वाहने, १९९७ मध्ये ३३ लक्ष ७५ हजार रुपयांची १0 वाहने, १९९८ मध्ये ३४लक्ष १0 हजार रुपयांची १७ वाहने, १९९९ मध्ये २८ लक्ष ५0 हजार रुपयांची ११ वाहने, २000 मध्ये १२ लक्ष ९0 हजार रुपयांची ४ वाहने, २00१ मध्ये ४८ लक्ष ७४ हजार रुपयांची १७ वाहने, २00२ मध्ये ५४ लक्ष ३0 हजार रुपयांची १४ वाहने, २00३ मध्ये ६९ लक्ष ७0 हजार रुपयांची २0 वाहने, २00४ मध्ये ४८ लक्ष २९ हजार रुपयांची १२ वाहने, २00५ मध्ये ५४ लक्ष २१ हजार रुपयांची १९ वाहने, २00६ मध्ये ८६ लक्ष १२ हजार रुपयांची २६ वाहने, २00७ मध्ये ३८ लक्ष ९२ हजार रुपयांची १३ वाहने, २00८ मध्ये १ कोटी ३१ लक्ष २0 हजार ५७७ रुपयांची २८ वाहने, २00९ मध्ये २ कोटी २८ लक्ष ६७ हजार ५0९ रुपयांची ४३ वाहने, २0१0 मध्ये ५४ लक्ष २८ हजार २६७ रुपयांची १५ वाहने, २0११ मध्ये ९0 लक्ष ९ हजार रुपयांची ३0 वाहने, २0१२ मध्ये ६८ लक्ष ७१ हजार रुपयांची १९ वाहने, २0१३ मध्ये १ कोटी १९ लक्ष ६५ हजार ५५0 रुपयांची २८ वाहने आणि यावर्षी ३0 एप्रिल २0१४ पयर्ंत १ कोटी ३१ लक्ष रुपयांची ७ वाहने भस्मसात केली. यात १0३ ट्रक, १५१ ट्रॅक्टर, २६ रोड रोलर, ३३ टिप्पर यासह जेसीबी मशीन, ट्रॉली, पोकलँड मशीन, टँकर, जीप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अशा १0४ वाहनांसह एकूण ४१७ वाहनांचा समावेश आहे.नक्षलवादी सध्याही जाळपोळीच्या घटना घडवित आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात रस्ते व पुल होऊ नये या करिता विकासकामे बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. शासनाने मध्यंतरी कंत्राटदारांना बांधकामस्थळावर सुरक्षा पुरविण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही जाळपोळीच्या घटना बंद झाल्या नाही. (शहर प्रतिनिधी)