शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

२00९ मध्ये जाळले सर्वाधिक वाहने

By admin | Updated: May 10, 2014 00:27 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते

गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात २00९ मध्ये सर्वाधिक वाहन नक्षलवाद्यांनी जाळले. या वर्षातच गडचिरोली पोलीस दलातील सर्वाधिक जवानसुध्दा शहीद झाले होते. हे वर्ष पोलीस दलासाठीही काळ वर्षच ठरले होते.१९८९ मध्ये नक्षल्यांनी ३ ट्रक, २ ट्रॅक्टर व एक मेटॅडोर अशी सहा वाहनांची जाळपोळ करून १४ लक्ष ६४ हजार ८६६ रुपयांचे नुकसान केले. १९९0 मध्ये १९ लक्ष ६५ हजार रुपयांची ९ वाहने, १९९१ मध्ये १७ लक्ष ४१ हजार रुपयांची ९ वाहने, १९९२ मध्ये २५ लक्ष २ हजार रुपयांची ९ वाहने, १९९३ मध्ये १४ लक्ष ५७ हजार रुपयांची १३ वाहने, १९९४ मध्ये ४२ लक्ष ७५ हजार रुपयांची १९ वाहने, १९९५ मध्ये ३ लक्ष रुपयांचा एक ट्रक, १९९६ मध्ये ६७ लक्ष ९0 हजार ६00 रुपयांची १८ वाहने, १९९७ मध्ये ३३ लक्ष ७५ हजार रुपयांची १0 वाहने, १९९८ मध्ये ३४लक्ष १0 हजार रुपयांची १७ वाहने, १९९९ मध्ये २८ लक्ष ५0 हजार रुपयांची ११ वाहने, २000 मध्ये १२ लक्ष ९0 हजार रुपयांची ४ वाहने, २00१ मध्ये ४८ लक्ष ७४ हजार रुपयांची १७ वाहने, २00२ मध्ये ५४ लक्ष ३0 हजार रुपयांची १४ वाहने, २00३ मध्ये ६९ लक्ष ७0 हजार रुपयांची २0 वाहने, २00४ मध्ये ४८ लक्ष २९ हजार रुपयांची १२ वाहने, २00५ मध्ये ५४ लक्ष २१ हजार रुपयांची १९ वाहने, २00६ मध्ये ८६ लक्ष १२ हजार रुपयांची २६ वाहने, २00७ मध्ये ३८ लक्ष ९२ हजार रुपयांची १३ वाहने, २00८ मध्ये १ कोटी ३१ लक्ष २0 हजार ५७७ रुपयांची २८ वाहने, २00९ मध्ये २ कोटी २८ लक्ष ६७ हजार ५0९ रुपयांची ४३ वाहने, २0१0 मध्ये ५४ लक्ष २८ हजार २६७ रुपयांची १५ वाहने, २0११ मध्ये ९0 लक्ष ९ हजार रुपयांची ३0 वाहने, २0१२ मध्ये ६८ लक्ष ७१ हजार रुपयांची १९ वाहने, २0१३ मध्ये १ कोटी १९ लक्ष ६५ हजार ५५0 रुपयांची २८ वाहने आणि यावर्षी ३0 एप्रिल २0१४ पयर्ंत १ कोटी ३१ लक्ष रुपयांची ७ वाहने भस्मसात केली. यात १0३ ट्रक, १५१ ट्रॅक्टर, २६ रोड रोलर, ३३ टिप्पर यासह जेसीबी मशीन, ट्रॉली, पोकलँड मशीन, टँकर, जीप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अशा १0४ वाहनांसह एकूण ४१७ वाहनांचा समावेश आहे.नक्षलवादी सध्याही जाळपोळीच्या घटना घडवित आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागात रस्ते व पुल होऊ नये या करिता विकासकामे बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. शासनाने मध्यंतरी कंत्राटदारांना बांधकामस्थळावर सुरक्षा पुरविण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही जाळपोळीच्या घटना बंद झाल्या नाही. (शहर प्रतिनिधी)