शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:19 IST

मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो.

ठळक मुद्देजिवती तालुक्यातील अनेक गावांत नेटवर्क नाही

दीपक साबने

चंद्रपूर : एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत; परंतु नेटवर्कअभावी लांबोरी व परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. लांबोरी, येल्लापूर, नारपठार, बुरियेसापूर, शेडवाही (लांबोरी) इत्यादी व परिसरातील गावांतील हजारो मोबाइलधारकांना तेलंगणाच्या नेटवर्कवर विसंबून राहावे लागत आहे.

तालुक्यात लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या तीन गावांमध्ये जिओचे टॉवर उभे केले आहेत. मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे मात्र, अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. ते फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. लांबोरी व परिसरातील गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो. तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.

मागील चार वर्षांअगोदर जिओच्या टॉवरचे काम सुरू झाले, ते पाहून नागरिक आनंदी होते. गावकऱ्यांनी जिओचे सीम घेऊन ठेवले. आज ना उद्या हे जिओचे टॉवर सुरू होतील आणि आपली नेटवर्कची समस्या सुटेल या आशेत गावकरी होते. मात्र, या आशेवर मागील चार वर्षांपासून विरजण पडल्याचे चित्र लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या गावांतील व परिसरातील नागरिकांत दिसून येत आहे.

ग्रामपंचायत लांबोरी येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता जिओचे टॉवर दिसले. तो सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्रदेखील ग्रामपंचायतीने दिले आहे. यासंदर्भात अनेक निवेदनेही देण्यात आली; परंतु अद्याप जिओचे टॉवर सुरू झाले नाहीत. टॉवर असून नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलधारकांना तेलंगणा राज्याच्या नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे.

लांबोरी या गावच्या परिसरातील नागरिक नेटवर्कच्या शोधात असतात. नेटवर्क भेटलेच तरी संपर्क होणे कठीण होते. इंटरनेट सेवा तर कुचकामीच ठरत आहे. अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना व गावातील परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. जिओचे टॉवर सुरू झाल्यावर मोबाइलधारकासह, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कामकाज करताना याचा लाभ होणार आहे. नेटवर्क नसल्यामुळे महागडे रिचार्ज निकामी ठरत आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInternetइंटरनेटSocialसामाजिक