शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

मोबाइल महाराष्ट्राचा अन् नेटवर्क तेलंगणाचे! फोन करायला जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:19 IST

मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र, ते अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो.

ठळक मुद्देजिवती तालुक्यातील अनेक गावांत नेटवर्क नाही

दीपक साबने

चंद्रपूर : एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत; परंतु नेटवर्कअभावी लांबोरी व परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. लांबोरी, येल्लापूर, नारपठार, बुरियेसापूर, शेडवाही (लांबोरी) इत्यादी व परिसरातील गावांतील हजारो मोबाइलधारकांना तेलंगणाच्या नेटवर्कवर विसंबून राहावे लागत आहे.

तालुक्यात लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या तीन गावांमध्ये जिओचे टॉवर उभे केले आहेत. मागील चार वर्षांपासून लांबोरी येथील जिओच्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे मात्र, अद्याप सुरू करण्यात आले नाहीत. ते फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. लांबोरी व परिसरातील गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो. तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.

मागील चार वर्षांअगोदर जिओच्या टॉवरचे काम सुरू झाले, ते पाहून नागरिक आनंदी होते. गावकऱ्यांनी जिओचे सीम घेऊन ठेवले. आज ना उद्या हे जिओचे टॉवर सुरू होतील आणि आपली नेटवर्कची समस्या सुटेल या आशेत गावकरी होते. मात्र, या आशेवर मागील चार वर्षांपासून विरजण पडल्याचे चित्र लांबोरी, पुडियाल मोहदा, वणी या गावांतील व परिसरातील नागरिकांत दिसून येत आहे.

ग्रामपंचायत लांबोरी येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता जिओचे टॉवर दिसले. तो सुरू करण्यास ना हरकत प्रमाणपत्रदेखील ग्रामपंचायतीने दिले आहे. यासंदर्भात अनेक निवेदनेही देण्यात आली; परंतु अद्याप जिओचे टॉवर सुरू झाले नाहीत. टॉवर असून नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलधारकांना तेलंगणा राज्याच्या नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे.

लांबोरी या गावच्या परिसरातील नागरिक नेटवर्कच्या शोधात असतात. नेटवर्क भेटलेच तरी संपर्क होणे कठीण होते. इंटरनेट सेवा तर कुचकामीच ठरत आहे. अनेक अडचणींचा सामना गावकऱ्यांना व गावातील परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. जिओचे टॉवर सुरू झाल्यावर मोबाइलधारकासह, शासकीय निमशासकीय कार्यालयातील कामकाज करताना याचा लाभ होणार आहे. नेटवर्क नसल्यामुळे महागडे रिचार्ज निकामी ठरत आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInternetइंटरनेटSocialसामाजिक