शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मिनी मंत्रालय करणार १२ लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:05 PM

महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनियोजन पूर्ण : जनजागृतीसाठी वृक्षदिंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ लाख पाच हजार वृक्षरोपनाचे नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जि. प. पदाधिकारी व अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील दोन गावात जाऊन वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षलागवड गावातील स्मशानभूमी, रस्त्याच्या दुतर्फा, गावातील खुल्या जागा, शाळा, अंगणवाडीचे आवार, गावातील मोकळे चौक, याशिवाय गावातील शासकीय दवाखाने, शासकीय इमारतीच्या मोकळ्या जागामध्ये केली जाईल. तसेच गावस्तरावर या कामात पुरेपुर लोकसहभाग मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांची सभा घेऊन वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे, नरेगामधून वृक्षरोपणासाठी खड्डे खोदकाम करण्याची कामे सुरू आहेत, अशी माहतीही भोंगळे यांनी दिली.वनमंत्र्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभवृक्षरोपणाचा कार्यक्रम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता ‘वृक्षदिंडी २०१८’ चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते २७ जूनला या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. याद्वारा वृक्षरोपण व वृक्ष जगविण्याकरिता व वृक्षरोपणाचे महत्त्व गावागावातील नागरिकांना माहित व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. वृक्षदिंडी गावागावात फिरवली जाणार असून गावस्तरावर याद्वारे वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे.