शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात कोट्यवधीची उलाढाल

By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.
गेल्या वर्षी दुष्काळाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पहायला मिळाला. उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरीवर्ग खरेदीपासुन दुरच होता. त्यामुळे बाजारात मंदी झालेली पहायला मिळाली. परंतु यंदा जिल्‘ासह संपुर्ण राज्यात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग नफ्यात आहे. तसेच नोकरदारांना मिळालेल्या वेतन वाढीचा परिणाम बाजारात दिसुन आला.
सुवर्ण बाजार बहरला
सुवर्ण बाजारात सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सराफा व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे गुंतवणुक दारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली होती. तसेच त्यामुळे गेल्यावर्षी ऐन दिवाळीत २ ते ३ कोटीची उलाढाल झाली होती. परंतु यंदा सुवर्ण बाजारात गुंतरवणुकदारांसह नोकरदार, शेतकरीवर्गाकडुन मोठी खरेदी झाल्याची माहिती आर.एल.ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्र्रकाश नहाटा यांनी दिली. तसेच पुढे येणार्‍या लग्नसराईमुळे देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे.
वाहनबाजारही सुसाट
वाहन बाजारात देखील मोठी उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत ग्राहकांची मागणी पाहता विविध वाहन कंपण्याकडुन लोन मध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. शहरात सुमारे दिवाळी काळात २ हजारहुन अधिक दुचाकी खरेदी झाल्याची माहिती वाहन होंडाचे व्यवस्थापक किरण चौधरी यांनी दिली. तर ३०० ते ३५० चारचाकी वाहनांची विक्री दिवाळीच्या चार दिवसात झाल्याची माहिती मानराज मोटर्सचे संचालक निंकुभ यांनी दिली. वाहन बाजारात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल यंदा दिवाळीत झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांसह शेतकरी वर्गाकडुन ट्रॅक्टरची देखील मोठी खरेदी झाली आहे.