शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

१६७ आदिवासी गावांचा तयार होणार मास्टर प्लान; २५ उपक्रमांचा असणार योजनेत समावेश.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:40 IST

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : चंद्रपुरातील ११५ तर चिमूर प्रकल्पातील ५५ गावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग झारखंड येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात झाली. या अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत १० तालुक्यांतील ११५ तर चिमूर प्रकल्पांतर्गत ५ तालुक्यांतील ५५ अशा १६७ गावांचा समावेश असून, यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष उन्नत ग्राम योजनेत आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी १७ शासकीय मंत्रालय विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने २५ उपक्रमांचा समावेश आहे. सक्षम पायाभूत सुविधा पुरविणे, पात्र कुटुंबांना पक्के घर, नळाचे पाणी, वीजपुरवठा उपलब्धतेसह पक्के घर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण केले जाईल.

या अंतर्गत आदिवासी गावे बारमाही जोडरस्ते व कनेक्टिव्हिटीने जोडली जाईल. आरोग्य, पोषण व शिक्षण, समग्र शिक्षा व पोषण प्रदान, कौशल्य विकास उद्योजकता प्रोत्साहन व वर्धित उपजीविका योजनांचा लाभ देण्यात येईल. 

आदिवासी मुलामुलींना दहावी व बारावीनंतर दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळेल. विपणन साहाय्य देणे, वनहक्कपट्टा धारकांसाठी टुरिस्ट होम स्टे, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालनासाठी साहाय्य देण्यात येईल. जिल्हा व तालुका स्तरावर शाळांत आदिवासी वसतिगृहे उभारण्यात येईल. फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे लसीकरण, आदिवासी गावे पीएम गतीशक्ती पोर्टलवर संलग्न केले जातील. अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.

अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मास्टर प्लानमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १६७ गावांचा कायापालट होऊन नागरिकांचीही उन्नती होण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रशासनही कामाला लागले आहेत.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTrible Development Schemeआदिवासी विकास योजना