शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

१६७ आदिवासी गावांचा तयार होणार मास्टर प्लान; २५ उपक्रमांचा असणार योजनेत समावेश.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:40 IST

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : चंद्रपुरातील ११५ तर चिमूर प्रकल्पातील ५५ गावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग झारखंड येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात झाली. या अभियानात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत १० तालुक्यांतील ११५ तर चिमूर प्रकल्पांतर्गत ५ तालुक्यांतील ५५ अशा १६७ गावांचा समावेश असून, यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष उन्नत ग्राम योजनेत आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी १७ शासकीय मंत्रालय विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने २५ उपक्रमांचा समावेश आहे. सक्षम पायाभूत सुविधा पुरविणे, पात्र कुटुंबांना पक्के घर, नळाचे पाणी, वीजपुरवठा उपलब्धतेसह पक्के घर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण केले जाईल.

या अंतर्गत आदिवासी गावे बारमाही जोडरस्ते व कनेक्टिव्हिटीने जोडली जाईल. आरोग्य, पोषण व शिक्षण, समग्र शिक्षा व पोषण प्रदान, कौशल्य विकास उद्योजकता प्रोत्साहन व वर्धित उपजीविका योजनांचा लाभ देण्यात येईल. 

आदिवासी मुलामुलींना दहावी व बारावीनंतर दीर्घकालीन कौशल्य अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळेल. विपणन साहाय्य देणे, वनहक्कपट्टा धारकांसाठी टुरिस्ट होम स्टे, कृषी, पशुसंवर्धन व मत्स्यपालनासाठी साहाय्य देण्यात येईल. जिल्हा व तालुका स्तरावर शाळांत आदिवासी वसतिगृहे उभारण्यात येईल. फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे लसीकरण, आदिवासी गावे पीएम गतीशक्ती पोर्टलवर संलग्न केले जातील. अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.

अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मास्टर प्लानमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १६७ गावांचा कायापालट होऊन नागरिकांचीही उन्नती होण्यास मदत होणार आहे. यासाठी प्रशासनही कामाला लागले आहेत.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTrible Development Schemeआदिवासी विकास योजना