शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अन् बोहल्यावर चढण्यापूर्वीच 'त्याला' मृत्यूने कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 11:15 IST

आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्दे आनंदाचा क्षण काळाने हिरावून घेतला

चंद्रपूर :मृत्यू कसा आणि केव्हा येईल, हे आपल्या हाती नसते. पण उभ्या आयुष्यात आनंदाची क्षणे आपल्या नशिबी येणार, याची वाट बघत असतानाच मृत्यू येणे यासारखे दुर्दैव ते कोणते. अशी हदयद्रावक घटना ब्रह्मपुरीच्या गोसीखुर्द कॅनलजवळ रविवारी घडली. एका चारचाकी वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. यात एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.

आशिष मुळे (२५) रा. खरबी असे मृतकाचे नाव असून त्याचे फेब्रुवारी महिन्यात लग्न होऊ घातले होते. यात दुचाकीवरील समीर बागडे (२१) रा. माहेर हा गंभीर जखमी झाला आहे. आशिष मुळे यांचा गौण खनिज वाहण्याचा व्यवसाय होता. त्यांचे लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घातले होते. घरी आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तारीख जवळ आल्याने खरेदीला वेग आला होता. पण काळाने हे क्षण हिरावून घेतले व लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच आशिषला रविवारी मृत्यूने कवटाळले.

आशिष व समीर हे आपल्या मोटरसायकलने ब्रह्मपुरीला येत असताना गोसेखुर्द कॅनलजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला, तर समीर हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर बोलेरोचा चालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, वाहतूक पोलीस राहुल लाखे, पोलीस अंमलदार संदेश देवगडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू