शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याची आत्महत्या; मन हेलावून टाकणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 15:33 IST

मागील काही दिवसांपासून संजय हा आर्थिक विवंचनेत होता आणि त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची बाब समोर आली आहे.

वरोरा (चंद्रपूर) : येथे दोन चिमुकल्या मुलांना ठार करून पित्याने वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा येथे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वरोरा आणि गिरड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अस्मित (८) व मिस्टी (३) अशी मृत दोन चिमुकल्या मुलांची नावे आहेत. तर, संजय श्रीराम कांबळे (रा. बोर्डा) पित्याचे नाव आहे. संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवत होता, तर त्याची पत्नी ही शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला आहे. 

शुक्रवारी मुलगा अस्मित हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजीकडे गेला होता. यावेळी संजयने त्याला घरी परत आणले, तर लहान मुलगी मिस्टी ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना घरात ठेवले. सायंकाळी मुलांची आई घरी आली असता, तिला दोन्ही मुले बिछान्यावर निपचित पडलेली दिसली. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि हालचाल बंद होती. तिने लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. 

दोन चिमुकल्या भावंडांचा घरातच संशयास्पद मृत्यू, घटनेनंतर बाप फरार

या घटनेनंतर संजय कांबळे हा फरार होता. त्याचा भ्रमणध्वनीही बंद येत होता. संजयची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. संजय कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान संजयचा वर्धा जिल्ह्यात मृतदेह आढळून आला. संजयने हे पाऊल आर्थिक विवंचनेतून उचलले की त्यामागे अन्य काही कारणे होती, याचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwarora-acवरोराchandrapur-acचंद्रपूर