राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

By Admin | Updated: October 19, 2015 01:30 IST2015-10-19T01:30:29+5:302015-10-19T01:30:29+5:30

आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला.

To make the concept of ideal country of the nation, try to do the heart | राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

सुधीर मुनगंटीवार : मार्गदर्शन कार्यशाळेत केले आवाहन
चंद्र्रपूर : आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला. आदर्श ग्राम गाव योजनेंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेली २७ गावे पहिल्या टप्प्यात आदर्श करण्याचा आपण सर्वशक्तिनिशी प्रयत्न करू. जलयुक्त शिवार योजना, मनरेगा यासारखी कामे मोठया प्रमाणात लोकसहभागातून केली जाऊ शकतात. प्रत्येक कामासाठी निधी आवश्यकच आहे असे नाही. संस्कार व इतर कामे हे निधीशिवाय गावात होऊ शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंत:करणापासून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या आदर्श ग्राम मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, हरीश शर्मा, भास्कर थेरे पाटील, यशदाचे संचालक सुमेध गुर्जर, साधनव्यक्ती रामलाल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अल्का लोणकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहिते आदींची प्रामुख्?याने उपस्थित होते.
कार्यशाळेत बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २७ गावांशी संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पेयजल तसेच शेतीसाठी पाणी या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी गावागावांत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाचा भौतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तसेच मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातूनच आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यातील २७ गावे हे राज्यातील इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरावी, यादृष्टीने आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: To make the concept of ideal country of the nation, try to do the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.