शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:32 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.जिल्ह्याच्या तापमानात दरवर्षी प्रमाणे यंदाही उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचा भडका उडाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तप्त उन्हात बाहेर पडायची हिंमत कुणीही करीत नाही. मात्र, ऊन वारा असो की पाऊस शेतकºयांना शेतात राबल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. गतवर्षी शेतकºयांनी शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्चच अधिक वाढल्याने शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी नेहमीच होरपळ होत आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपल्याने शेतीवर अवकळा आली. मागील हंगामाच्या उत्पादनाचा टक्का घसरला. यावषीर् शेतकºयांनी शेतमाल विकल्यानंतर दर वाढल्याने त्याचा लाभ शेतकºयांना होण्याऐवजी व्यापाºयांना झाला. यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतीवर शेतकºयांचा वर्षभराचा बजेट अवलंबू असतो. पण, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतकºयांना अािर्थक संकटाचा सामना करावा लागत आहे. ४५ अंशाच्या तापमानातही शेतकºयांना शेतीची कामे करावी लागत आहे. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी दरवर्षी निराशाच येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सिंचनाची कमतरता आदी कारणांमुळे शेतकरी होरपळून निघत आहे. याचे राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नापिकीकडे दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचे नुकसान होत असल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तापमानाने उच्चांक गाठल्याने लाहीलाही होत आहे. मागील वर्षी अल्प पाऊस पडले. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढले आहे. चाºयाची तिव्र टंचाई जाणावायला लागल्याने बेहाल झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही वेळ आल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.जनावरांचे हालनदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरपना तालुक्याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती