शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

रखरखत्या उन्हात शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:32 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबल्याशिवाय पर्याय नाही नापिकी, कर्ज बाजारीपणामुळे यंदा शेतकऱ्यांची होरपळ झाली. पण, उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून सुर्य आग ओकत असतानाही खरीप हंगामाच्या कामात व्यस्त झाल्याचे परिसरात दिसून येत आहे.जिल्ह्याच्या तापमानात दरवर्षी प्रमाणे यंदाही उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचा भडका उडाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तप्त उन्हात बाहेर पडायची हिंमत कुणीही करीत नाही. मात्र, ऊन वारा असो की पाऊस शेतकºयांना शेतात राबल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. गतवर्षी शेतकºयांनी शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्चच अधिक वाढल्याने शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी नेहमीच होरपळ होत आली आहे. कोरडवाहू शेतीचे दिवस संपल्याने शेतीवर अवकळा आली. मागील हंगामाच्या उत्पादनाचा टक्का घसरला. यावषीर् शेतकºयांनी शेतमाल विकल्यानंतर दर वाढल्याने त्याचा लाभ शेतकºयांना होण्याऐवजी व्यापाºयांना झाला. यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतीवर शेतकºयांचा वर्षभराचा बजेट अवलंबू असतो. पण, नापिकीमुळे दिवसेंदिवस शेतकºयांना अािर्थक संकटाचा सामना करावा लागत आहे. ४५ अंशाच्या तापमानातही शेतकºयांना शेतीची कामे करावी लागत आहे. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहे. परंतु शेतकºयांच्या पदरी दरवर्षी निराशाच येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सिंचनाची कमतरता आदी कारणांमुळे शेतकरी होरपळून निघत आहे. याचे राज्यकर्त्यांना सोयरसुतक नाही. नापिकीकडे दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचे नुकसान होत असल्याने शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तापमानाने उच्चांक गाठल्याने लाहीलाही होत आहे. मागील वर्षी अल्प पाऊस पडले. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढले आहे. चाºयाची तिव्र टंचाई जाणावायला लागल्याने बेहाल झाले आहे. एप्रिल महिन्यातच ही वेळ आल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.जनावरांचे हालनदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी जनावरांना नाईलाजाने विक्रीला काढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरपना तालुक्याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती