शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

म. गांधी १५० वे जयंती वर्ष; चंद्रपूर नगर परिषदेने प्रदान केले होते गौरवपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:03 PM

असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले होते.

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रिटीश सत्तेविरूद्धचा भारतीय स्वातंत्र्यलढा देशभरात पोहोचावा, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी विविध राज्यांमध्ये दौरे करून जनमानस चेतविले. असहकार आंदोलन व अपृश्यता निर्मूलन या दोन उद्दिष्ठांसाठी गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ व १४ नोव्हेंबर १९३३ रोजी चंद्रपूरला भेट दिली. या दोन्ही भेटीत तत्कालीन चांदा नगर परिषदच्या वतीने गांधीजींना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.देशभरात असहकार आंदोलन सुरू केल्यानंतर महात्मा गांधी हे १९२७ च्या फेब्रुवारी  महिन्यात सेवाग्राम येथे होते. दरम्यान, चंद्रपुरातील तत्कालीन नेते पंडित बालगोंविद तिवारी, विश्वनाथ दीक्षित, मा. सां. कन्नमवार, बाजीराव फुलझेले, बळवंतराव देशमुख, पुराणिक, सेठ लोमाकरण, कोवळे, शंकर वैद्य, डॉ. तेलंग, अब्दुल रजाक आदींच्या उपस्थितीत दाजीबाजी देवईकर यांच्या घरी बैठक घेतली. गांधीजींना चंद्रपुरात बोलाविण्याचे निश्चित केले. त्यानंतर देवईकर व मा. सां. कन्नमवार यांनी सेवाग्राम येथे जाऊन गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी ४ फेब्रुवारी  १९२७ रोजी येण्याचे मान्य करताच जय्यत तयारी करण्यात आली. टिळक मैदानात जाहीर सभा झाली. स्वागत समितीचे अध्यक्ष विश्वनाथ दीक्षित व सचिव खुशालचंद्र खजांची यांनी भूषविले. नगर परिषदने गांधीजींना गौरवपत्र प्रदान केले. महात्मा गांधीजींनी चंद्रपूर शहराला १४ नोव्हेंबर १९३३ रोजी दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी अस्पृश्यता निवारणाचा विचार मांडण्यासाठी याच मैदानावर सभा झाली. या सभेत बहुसंख्य दलित बांधवांना बोलावण्यात आले. देवाजी बापू खोबरागडे यांनीही विचार मांडले. चंद्रपुरातील जनतेने गांधीजींना सात हजारांची थैली प्रदान केली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी