नियंत्रण कक्षाची बियाणे बाजारावर नजर
By Admin | Updated: May 15, 2014 23:25 IST2014-05-15T23:25:59+5:302014-05-15T23:25:59+5:30
दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे.

नियंत्रण कक्षाची बियाणे बाजारावर नजर
चंद्रपूर : दरवर्षी बियाण्यांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण करून अनेकजण शेतकर्यांची लुट करतात. मात्र यावर्षी कृषी विभागाची बियाण्यांच्या काळ्या बाजारावर करडीनजर राहणार आहे. जिल्हास्थळावर एक आणि तालुकास्तरावर १५ अशा एकूण सोळा सोयाबीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकार्यांच्या नियंत्रणात एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. तालुकास्तरावरील अधिकार्यांना अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली लागणार आहे. या नियंत्रण कक्षातून सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता, त्यांचे समान वितरण याची माहिती असणार आहे. मागील वर्षातील चांगल्या प्रतीच्या उपलब्ध सोयाबीनबाबत माहिती संकलित करण्यासह शेतकर्यांशी संपर्कात राहून अर्धवेळ गुणनियंत्रकांना नमुने काढावे लागणार आहे. या माध्यमातून शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता कशी होईल, यादृष्टीने तालुका कृषी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्यास कक्षाला कळविण्याचे आवाहनही विभागाने केले आहे. मागील काही वर्षात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बियाण्यांची मागणीही वाढली आहे. खरिपाच्या तोंडावर कंपन्यांकडून बियाणे येत असले तरी, काही कृषी केंद्र संचालकांकडून कृत्रिम टंचाई भासववली जाते. यामुळे शेतकर्यांना जादा रक्कम देऊन बियाणे खरेदी करावी लागतात. मात्र यावर्षी सोयाबीन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून यावर आळा बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख १0 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ४ लख ४0 हजार बिटी कापसाच्या पिशव्यांची मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन मागणी करण्यात आली. पैकी ४ लाख ७१ हजार पिशव्यांचे आवंटन जिल्ह्यासाठी आयुक्तालयाकडून प्राप्त झाले. खरीप हंगामासाठी ७३ हजार ८00 मेट्रीक टन खताचे आवंटन झाले. सध्या ८ हजार १0६ मेट्रीक टन युरिया टन खताचे आवंटन झाले. इतर खतांचा १८ हजार ४0१ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध असून हा मुबलक असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मूल येथे रॅक पॉइंट मंजूर असल्याने त्याचा गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांना लाभ होईल. असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)