शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या आशीर्वादानेच विस्तारला 'लोकमत'चा वटवृक्ष : विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 14:33 IST

सर्वसामान्यांच्या आशीर्वादानेच 'लोकमत'चा आज वटवृक्ष झाला, असे प्रतिपादन 'लोकमत' एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.

ठळक मुद्देलोकमत सुवर्ण महोत्सवी कृतज्ञता पर्वाचा चंद्रपुरात शुभारंभ

चंद्रपूर : सर्वसामान्य वाचकांचे मुखपत्र व जनसामान्यांचा आवाज बनावे, या उदात्त हेतूने श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी १५ डिसेंबर १९७१ रोजी नागपूर येथे 'लोकमत' सुरू केले. 'पत्रकारिता परमो धर्म:' या तत्त्वाचे पालन करून त्यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले. सर्वसामान्यांच्या आशीर्वादानेच 'लोकमत'चा आज वटवृक्ष झाला, असे प्रतिपादन 'लोकमत' एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुरुवारी येथील एन. डी. हॉटेल सभागृहात आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

मंचावर 'लोकमत'चे संचालक (परिचालन) अशोक जैन, आमदार प्रतिभा धानोरकर, 'लोकमत'चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, 'लोकमत समाचार'चे कार्यकारी संपादक विकास मिश्र, वितरण महाव्यवस्थापक संतोष चिपडा उपस्थित होते. 'लोकमत'च्या गौरवशाली वृत्तपत्र परंपरेचा गौरव करताना विजय दर्डा म्हणाले, चंद्रपुरातून सुवर्ण महोत्सवाची सुरुवात झाली. यापुढे विदर्भातील अकराही जिल्ह्यांत अशा प्रकारचा सुवर्ण महोत्सव साेहळा घेणार आहाेत. 'लोकमत'ची वाटचाल फार संघर्षातून झाली. ग्रामीण भागाला समृद्ध केले नाही तर समाज व देशाचा विकास हाेणार नाही, याचे भान ठेवूनच अगदी प्रारंभापासून लाेकशाहीचा विचार सामान्य लोकांपर्यंत पाेहोचविण्याचे काम केले. त्यामुळे 'लोकमत' महाराष्ट्रातील जनमानसात रुजला आणि लोकांचा आधार बनला. वृत्तपत्र चालविणे ही आज तारेवरची कसरत आहे. मात्र वाचकप्रियतेमुळे आपण आनंददायी सुवर्ण महोत्सव साजरा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, माझे माहेर यवतमाळ जिल्ह्याचे असल्याने मी शालेय जीवनापासून 'लोकमत' वाचते; त्यामुळे ‘लोकमत’शी माझा जुना ऋणानुबंध आहे. आमच्या राजकीय यशात 'लोकमत'चाही मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील लोकांची तळमळ 'लोकमत'मध्ये उमटते. त्यामुळे ‘लोकमत’ लोकांच्या मनात घर करून आहे. 'लोकमत'मध्ये वृत्त झळकताच पाथरी येथील पाणीपुरवठा समस्या कशी सुटली, त्याची एक आठवणही त्यांनी सांगितली. कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनी प्रास्ताविकातून सुवर्ण महोत्सवामागची भूमिका मांडली. राजेश भोजेकर यांनी संचालन केले.

महिलांचा सन्मान नसेल तर समाज अपूर्ण

‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याचा निर्णय का घेतला, हे विशद करताना विजय दर्डा म्हणाले, जोपर्यंत महिलांचा सन्मान केला जात नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगती करू शकत नाही. महिलांवर दुहेरी जबाबदाऱ्या असतात. त्या आमच्या आवडीनिवडी सांभाळतात. कुटुंबाला पुढे नेतात. महिलांचा सन्मान होत नसेल तर तो समाज अपूर्ण असतो. म्हणूनच ज्योत्स्नाजींनी ‘सखी मंच’ तयार केला. ‘सखी मंच’च्या आज तीन लाख सदस्य आहेत.

लोकांनी दिले 'लोकमत' ला बळ

कोरोनाकाळात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. कागदाच्या किमती वाढल्या. अशा संकटातही 'लोकमत' जिवंत राहिला. या काळात १ लाख ३४ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही वृत्तपत्रांच्या आवृत्त्या व वाहिन्या बंद झाल्या. मात्र श्रद्धेय बापूजींच्या शिकवणीमुळे ‘लोकमत’ला लोकांनी बळ दिले. वार्ताहर, वितरक व सर्वांनी निष्ठेने, धडाडीने निर्भीडपणे काम केले. मी स्वत: 'लोकमत' समूहातील तीन हजार कर्मचाऱ्यांशी कोरोनाकाळात संवाद साधला. आज तुमच्या कर्तृत्वाला सन्मानित करून आम्ही स्वत:च सन्मानित झालो आहोत, अशी भावनाही विजय दर्डा यांनी व्यक्त केली.

पुढील ५० वर्षांची रूपरेखा तयार

सोहळ्यातील चैतन्यदायी क्षणांचा उल्लेख करून विजय दर्डा म्हणाले, आपण सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित झालात. आजच्या प्रेरणादायी आठवणी घेऊन जाणार आहोत. ‘लोकमत’ने ५० वर्षे जनसेवा केली. यापुढील ५० वर्षांची रूपरेखा तयार आहे. देवेंद्र दर्डा, ऋषी व करण दर्डा ही नवीन पिढी लोकसेवेचा वसा घेऊन ध्येयाने कार्यरत आहे. सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून लोकमत वाटचाल करील. बातमी देताना लोकमत कुणाची नावे बघत नाही तर सत्याकडे बघतो, याकडे लक्ष वेधून वाचक, वार्ताहर व वितरकांच्या कार्याची विजय दर्डा यांनी प्रशंसा केली.

सत्काराने भगिनी भारावल्या

विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिला सत्काराने भारावल्या. आपल्या कार्यासाठी 'लोकमत'ने कसे सहकार्य केले, याची आठवण प्रा. मंजूषा बजाज यांनी कथन केली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगूबाई ऊर्फ अम्मा यांनी टोपल्या विकून मुलाला आमदार केले. 'मुलगा आमदार झाला म्हणून मी टोपल्या विकणे का सोडू?' असा अम्मांचा सवाल होता. ‘काम कोणतेही छोटे नसते. कामाला निष्ठा व श्रद्धा असते. तुम्ही कामाला धर्म मानले. आई एक शक्ती असते. तुमचा अभिमान आहे,’ या शब्दांत विजय दर्डा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :SocialसामाजिकLokmat Eventलोकमत इव्हेंटLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा