शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

Lok Sabha Election 2019; असे चालते ईव्हीएमचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:54 IST

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे.

ठळक मुद्देमतदारांमध्ये कुतूहल कायम निवडणुका म्हणजे लोकशाहीचा जणू उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे. परंतु, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम व कुतूहलाचे वातावरण आहे. त्यामुळे मशीनचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.

-ईव्हीएममध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात?ईव्हीएममध्ये कमाल ३,८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० हून कमी मतदारांची संख्या असते.

- वीज पुरवठा नसलेल्या भागात ईव्हीएम कसे वापरले जाते?ईव्हीएम विद्युत पुरवठ्यावर अवलंबून नसते. ते अल्कलाईन बॅटरीवर चालते.

- ईव्हीएममध्ये किती उमेदवार सामावू शकतात?उमेदवारांची संख्या ६४ पर्यंत असल्यास ईव्हीएमद्वारे निवडणुका घेता येतात.

- उमेदवारांची संख्या ६४ हून अधिक झाल्यास काय होते?अशा प्रकरणात पारंपरिक मतपत्रिका व मतपेट्यांच्या पद्धतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.

- मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम आणण्याची गरज का पडली?मतमोजणी करण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ तसेच कधीकधी दोन दिग्गज उमेदवारांच्या मतांमध्ये कमी फरक आढळल्यास फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखी कठीण होत असे. देशात ईव्हीएमची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडकडून केली जाते.

- भारताव्यतिरिक्त ईव्हीएम कोणत्या देशात वापरले जाते?नेपाळ व भूतानमध्ये ईव्हीएम वापरले जाते.

-देशात ईव्हीएम प्रथम कुठे वापरली गेली?१९८२ रोजी केरळ राज्यातील परुर विधानसभा मतदारसंघात ५० जागांवर यंत्र वापरले.

- ईव्हीएमचे फायदे कोणते?अवैध व शंकास्पद मते टाळता येतात. मतमोजणी जलद होते. एकच मतपत्रिका आवश्यक असल्यामुळे छपाई खर्चात बचत होते.

- ईव्हीएम सीलबंद करण्याची काय पद्धत आहे? असे का केले जाते? हे कसे केले जाते?ईव्हीएमल संपूर्णपणे वेष्टनात गुंडाळले जाते. जेणेकरून त्याच्या बटणांना कुणालाही हात लावता येणार नाही. त्यावरील रिझल्ट सेक्शनलाही सीलबंद केले जाते. मतमोजणीआधी कुणालाही निकाल कळत नाही. सीलवर मतदान अधिकाऱ्यांच्या सीलबरोबरच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची सही घेतले जाते.

- मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम कुठे ठेवली जातात?मतदानानंतर सुरक्षित ठिकाणी मतदान यंत्र ठेवली जातात. जवळपासच्या ठिकाणी जिथे उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखरेख ठेऊ शकतो. बहुतेकदा ही यंत्र मतमोजणीच्याच ठिकाणी ठेवली जातात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक