शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Lok Sabha Election 2019; असे चालते ईव्हीएमचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:54 IST

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे.

ठळक मुद्देमतदारांमध्ये कुतूहल कायम निवडणुका म्हणजे लोकशाहीचा जणू उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे. परंतु, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम व कुतूहलाचे वातावरण आहे. त्यामुळे मशीनचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.

-ईव्हीएममध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात?ईव्हीएममध्ये कमाल ३,८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० हून कमी मतदारांची संख्या असते.

- वीज पुरवठा नसलेल्या भागात ईव्हीएम कसे वापरले जाते?ईव्हीएम विद्युत पुरवठ्यावर अवलंबून नसते. ते अल्कलाईन बॅटरीवर चालते.

- ईव्हीएममध्ये किती उमेदवार सामावू शकतात?उमेदवारांची संख्या ६४ पर्यंत असल्यास ईव्हीएमद्वारे निवडणुका घेता येतात.

- उमेदवारांची संख्या ६४ हून अधिक झाल्यास काय होते?अशा प्रकरणात पारंपरिक मतपत्रिका व मतपेट्यांच्या पद्धतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.

- मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम आणण्याची गरज का पडली?मतमोजणी करण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ तसेच कधीकधी दोन दिग्गज उमेदवारांच्या मतांमध्ये कमी फरक आढळल्यास फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखी कठीण होत असे. देशात ईव्हीएमची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडकडून केली जाते.

- भारताव्यतिरिक्त ईव्हीएम कोणत्या देशात वापरले जाते?नेपाळ व भूतानमध्ये ईव्हीएम वापरले जाते.

-देशात ईव्हीएम प्रथम कुठे वापरली गेली?१९८२ रोजी केरळ राज्यातील परुर विधानसभा मतदारसंघात ५० जागांवर यंत्र वापरले.

- ईव्हीएमचे फायदे कोणते?अवैध व शंकास्पद मते टाळता येतात. मतमोजणी जलद होते. एकच मतपत्रिका आवश्यक असल्यामुळे छपाई खर्चात बचत होते.

- ईव्हीएम सीलबंद करण्याची काय पद्धत आहे? असे का केले जाते? हे कसे केले जाते?ईव्हीएमल संपूर्णपणे वेष्टनात गुंडाळले जाते. जेणेकरून त्याच्या बटणांना कुणालाही हात लावता येणार नाही. त्यावरील रिझल्ट सेक्शनलाही सीलबंद केले जाते. मतमोजणीआधी कुणालाही निकाल कळत नाही. सीलवर मतदान अधिकाऱ्यांच्या सीलबरोबरच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची सही घेतले जाते.

- मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम कुठे ठेवली जातात?मतदानानंतर सुरक्षित ठिकाणी मतदान यंत्र ठेवली जातात. जवळपासच्या ठिकाणी जिथे उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखरेख ठेऊ शकतो. बहुतेकदा ही यंत्र मतमोजणीच्याच ठिकाणी ठेवली जातात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक