शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:59 IST

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

ठळक मुद्दे कन्वेअर बेल्टमधून पडणाऱ्या लाइमस्टोनने अंमलनाला प्रकल्पही प्रभावित

राजेश भाेजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : माणिकगड सिमेंट उद्योगाला सिमेंटचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे लाइमस्टोन सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कुसुंबी येथून कन्वेअर बेल्ट आणि रोप-वेच्या माध्यमातून कंपनीत आणला जातो. हे आणताना करावयाच्या आवश्यक सुरक्षेकडे मात्र कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून आले. शिवाय हा कन्वेअर बेल्ट चक्क अंमलनाला प्रकल्पातून गेला आहे. या मार्गे जाणारा लाइमस्टोन मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाच्या पाण्यात पडत असून पाणी साठवणूक क्षमतेवर प्रभाव पडतो आहे.

कंपनीपासून जिवती मार्ग जातो. या मार्गावर कंपनीच्या मागील बाजूला अंमलनाला धरण आहे. जिवती मार्ग आणि अंमलनाला धरणावरून कंपनीचा लाइमस्टोन आणणारा कन्वेअर बेल्ट व रोप-वे आहे. कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या खालून राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याने परिसरातील नागरिकांसह अन्य तालुक्यातून अंमलनाला धरणावर व माणिकगड किल्ल्यावर पर्यटनासाठी मंडळी ये-जा करतात. खाणीतून कन्वेअर बेल्टने येणारा लाइमस्टोन ठिकठिकाणी खाली पडत असल्याचे ढिगाऱ्यांवरून लक्षात येते. रस्त्यावरही हे लाइमस्टोन पडतात. यामुळे अपघात झाले नाहीत हा मुद्दा गौण असला, तरी अपघात झाल्यावरच सुरक्षा करायची का, असा प्रश्न येथून जाताना पडतो.

समाधीही लाइमस्टोनने बुजली

कन्वेअर बेल्टच्या खालच्या बाजूला महादेव मल्लाजी सुद्धाले यांची समाधी आहे. या समाधीवर हे लाइमस्टोन पडत असतात. यामुळे ही समाधी अर्धवट बुजली आहे. याकडे काही दिवस लक्ष दिले नाही तर या समाधीलाच लाइमस्टोन समाधिस्त करेल, असेच चित्र आहे.

ट्रकद्वारे लाइमस्टोनची वाहतूक

अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटसाठी कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या लाइमस्टोनची माणिकगडमधून ट्रकद्वारे अल्ट्राटेक आवारपूर कंपनीत वाहतूक केली जाते. दररोज सुमारे ५०० टन लाइमस्टोन नेला जातो. याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

सात दिवसांचा अल्टिमेटम संपला

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गडचांदूर येथील कृती समितीने मागणी केल्याने अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. हा कालावधी आता संपलेला आहे. तरीही ही कंपनी प्रदूषण करतच आहे. यानंंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हालचाली होत असल्याचे दिसत नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर