शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:59 IST

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

ठळक मुद्दे कन्वेअर बेल्टमधून पडणाऱ्या लाइमस्टोनने अंमलनाला प्रकल्पही प्रभावित

राजेश भाेजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : माणिकगड सिमेंट उद्योगाला सिमेंटचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे लाइमस्टोन सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कुसुंबी येथून कन्वेअर बेल्ट आणि रोप-वेच्या माध्यमातून कंपनीत आणला जातो. हे आणताना करावयाच्या आवश्यक सुरक्षेकडे मात्र कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून आले. शिवाय हा कन्वेअर बेल्ट चक्क अंमलनाला प्रकल्पातून गेला आहे. या मार्गे जाणारा लाइमस्टोन मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाच्या पाण्यात पडत असून पाणी साठवणूक क्षमतेवर प्रभाव पडतो आहे.

कंपनीपासून जिवती मार्ग जातो. या मार्गावर कंपनीच्या मागील बाजूला अंमलनाला धरण आहे. जिवती मार्ग आणि अंमलनाला धरणावरून कंपनीचा लाइमस्टोन आणणारा कन्वेअर बेल्ट व रोप-वे आहे. कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या खालून राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याने परिसरातील नागरिकांसह अन्य तालुक्यातून अंमलनाला धरणावर व माणिकगड किल्ल्यावर पर्यटनासाठी मंडळी ये-जा करतात. खाणीतून कन्वेअर बेल्टने येणारा लाइमस्टोन ठिकठिकाणी खाली पडत असल्याचे ढिगाऱ्यांवरून लक्षात येते. रस्त्यावरही हे लाइमस्टोन पडतात. यामुळे अपघात झाले नाहीत हा मुद्दा गौण असला, तरी अपघात झाल्यावरच सुरक्षा करायची का, असा प्रश्न येथून जाताना पडतो.

समाधीही लाइमस्टोनने बुजली

कन्वेअर बेल्टच्या खालच्या बाजूला महादेव मल्लाजी सुद्धाले यांची समाधी आहे. या समाधीवर हे लाइमस्टोन पडत असतात. यामुळे ही समाधी अर्धवट बुजली आहे. याकडे काही दिवस लक्ष दिले नाही तर या समाधीलाच लाइमस्टोन समाधिस्त करेल, असेच चित्र आहे.

ट्रकद्वारे लाइमस्टोनची वाहतूक

अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटसाठी कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या लाइमस्टोनची माणिकगडमधून ट्रकद्वारे अल्ट्राटेक आवारपूर कंपनीत वाहतूक केली जाते. दररोज सुमारे ५०० टन लाइमस्टोन नेला जातो. याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

सात दिवसांचा अल्टिमेटम संपला

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गडचांदूर येथील कृती समितीने मागणी केल्याने अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. हा कालावधी आता संपलेला आहे. तरीही ही कंपनी प्रदूषण करतच आहे. यानंंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हालचाली होत असल्याचे दिसत नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर