शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 15:59 IST

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

ठळक मुद्दे कन्वेअर बेल्टमधून पडणाऱ्या लाइमस्टोनने अंमलनाला प्रकल्पही प्रभावित

राजेश भाेजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : माणिकगड सिमेंट उद्योगाला सिमेंटचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे लाइमस्टोन सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कुसुंबी येथून कन्वेअर बेल्ट आणि रोप-वेच्या माध्यमातून कंपनीत आणला जातो. हे आणताना करावयाच्या आवश्यक सुरक्षेकडे मात्र कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून आले. शिवाय हा कन्वेअर बेल्ट चक्क अंमलनाला प्रकल्पातून गेला आहे. या मार्गे जाणारा लाइमस्टोन मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाच्या पाण्यात पडत असून पाणी साठवणूक क्षमतेवर प्रभाव पडतो आहे.

कंपनीपासून जिवती मार्ग जातो. या मार्गावर कंपनीच्या मागील बाजूला अंमलनाला धरण आहे. जिवती मार्ग आणि अंमलनाला धरणावरून कंपनीचा लाइमस्टोन आणणारा कन्वेअर बेल्ट व रोप-वे आहे. कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या खालून राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याने परिसरातील नागरिकांसह अन्य तालुक्यातून अंमलनाला धरणावर व माणिकगड किल्ल्यावर पर्यटनासाठी मंडळी ये-जा करतात. खाणीतून कन्वेअर बेल्टने येणारा लाइमस्टोन ठिकठिकाणी खाली पडत असल्याचे ढिगाऱ्यांवरून लक्षात येते. रस्त्यावरही हे लाइमस्टोन पडतात. यामुळे अपघात झाले नाहीत हा मुद्दा गौण असला, तरी अपघात झाल्यावरच सुरक्षा करायची का, असा प्रश्न येथून जाताना पडतो.

समाधीही लाइमस्टोनने बुजली

कन्वेअर बेल्टच्या खालच्या बाजूला महादेव मल्लाजी सुद्धाले यांची समाधी आहे. या समाधीवर हे लाइमस्टोन पडत असतात. यामुळे ही समाधी अर्धवट बुजली आहे. याकडे काही दिवस लक्ष दिले नाही तर या समाधीलाच लाइमस्टोन समाधिस्त करेल, असेच चित्र आहे.

ट्रकद्वारे लाइमस्टोनची वाहतूक

अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटसाठी कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या लाइमस्टोनची माणिकगडमधून ट्रकद्वारे अल्ट्राटेक आवारपूर कंपनीत वाहतूक केली जाते. दररोज सुमारे ५०० टन लाइमस्टोन नेला जातो. याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

सात दिवसांचा अल्टिमेटम संपला

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गडचांदूर येथील कृती समितीने मागणी केल्याने अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. हा कालावधी आता संपलेला आहे. तरीही ही कंपनी प्रदूषण करतच आहे. यानंंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हालचाली होत असल्याचे दिसत नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर