जीव धोक्यात घालून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:35+5:30
तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तालुक्याला या सुविधांबाबतीत भेदभाव करत असल्याची आरोप नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जीव धोक्यात घालून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्यातील माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मार्गाच्या बाजुला झाडेझुडुपे व वेली वाढल्या आहेत.झाडांच्या फाद्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. वळणाच्या ठिकाणी सामोरील वाहने दिसत नसल्याने अपघाताची भीती असते. साईडपट्ट्या नसल्याने समोरून वाहन आल्यावर वाहन कोणी खाली उतरावयाचे यावरूनही बऱ्याचदा वाद होतात.
तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तालुक्याला या सुविधांबाबतीत भेदभाव करत असल्याची आरोप नागरिकांनी व्यक्त केली आहे. जिवती ते गडचांदूर (माणिकगड मार्ग) आणि पाटण ते गडचांदूर (भेंडावी मार्ग) या रस्त्याच्या देखभालची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागकडे आहे. झाडे झुडुपे व वेली वाढल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यावर मोठी अडचण निर्माण होते. जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरूंद असल्याने झाडांमुळे अपघात होऊ शकतो.
जिवती तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था झाली. रुंदीचे रस्ता नसल्याने पाटण, जिवती तालुक्यातील नागरिक व कर्मचाऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडविण्याची गरज आहे.
-कंटू कोटनाके, जिवती