शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

राष्ट्र निर्मितीसाठी जातींचा त्याग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM

समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही.

ठळक मुद्देएम. टी. साव : मूल निवासी बहुजन एकजूट परिषद

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : समरसत्ता हा गोंडस शब्द बहुजन समाजामध्ये रूजविल्यामुळे सहिष्णूता धोक्यात आली आहे. म्हणूनच संसदीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रुपांतर होऊ शकली नाही. सशक्त राष्टÑाची निर्मिती झाली नाही. त्याकरिता मूलनिवासी बहुजन समाजाने जातीचा गर्व सोडावा, असे मत मूलनिवासी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. टी. साव यांनी व्यक्त केले. मूल निवासी बहुजन एकजूट परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.बामसेफ जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी रेडक्रॉस भवनात ही परिषद घेण्यात आली. या परिषदेचा विषय ‘समतामूलक समाज आणि सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी फक्त मूलनिवासी बहुजन समाजाची एकजूट अनिवार्य आहे’ असा होता. परिषदेचे उद्घाटन तैलिक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव फंड यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, अल्पसंख्याक संघटनेचे शेख अब्दुल वहाब, सूर्यकांत झाडे, प्रसिद्ध लेखक अशोक पवार, सतीश मालेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. जातीय विभाजनाने बहुसंख्याक असलेला बहुजन समाज अल्पसंख्याक झाला. याचा गैरफायदा शोषक समाजव्यवस्था घेत आहे. धर्म संरक्षणाच्या नावाखाली जातींचा वापर करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे मूलनिवासी ही संकल्पना स्वीकारून सर्व समाजातील नागरिकांनी प्रबोधनासाठी पुढे यावे, असा सूर या परिषदेत उमटला. लोकशाहीर दादाजी वाघमारे खुशाल साव, निर्विकार खोब्रागडे यांनी स्फूर्तीगीते सादर केलीत. प्रास्ताविक के. के. शेंडे तर संचालन पंकज जांगडेकर यांनी केले. यावेळी जी. के. उपरे, सेवकदास बरके, नरेंद्र गोस्वामी, ताराचंद भसारकर, एकनाथ साव, सुभाष गेडाम आदी उपस्थित होते.