कोरोना डोस घेण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचीच आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:46+5:30
राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरू झाली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये एससीडब्ल्यू १७ हजार ३४१, एफएलडब्लू श्रेणीतील ८ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत १६ हजार ३३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यात ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर जीएमसी, चंद्रपूर ग्रामीण व चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.

कोरोना डोस घेण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचीच आघाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी (एससीडब्ल्यू) मंगळवार (दि. १६) पर्यंत राज्यात आघाडी (७२ टक्के) घेतली. ३५ जिल्ह्यांमध्ये केवळ चंद्रपूर व पालघर या दोन जिल्ह्यांनाच एवढे उद्दिष्ठ गाठता आले. मात्र, शासनाच्या अन्य विभागातील एफएलडब्लू म्हणजे फ्रन्ट लाईन वर्कर अद्याप मागेच (४३ टक्के) असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या या कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
राज्यात १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरू झाली. लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये एससीडब्ल्यू १७ हजार ३४१, एफएलडब्लू श्रेणीतील ८ हजार ८०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत १६ हजार ३३७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यात ब्रह्मपुरी, भद्रावती, चंद्रपूर जीएमसी, चंद्रपूर ग्रामीण व चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. अन्य तालुक्यातील केंद्रांतील लसीकरणाचा वेग अजुनही वाढला नाही. त्यातही फ्रन्ट लाईन वर्करर्स माघारले. आरोग्य कर्मचारी श्रेणीत मात्र चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली. मंगळवार (दि. १६) पर्यंत संपूर्ण राज्यात फक्त चंद्रपूर व पालघर या दोनच जिल्ह्यात ७२ टक्के लसीकरण झाले.
एफएलडब्लू मागे राहण्याचे कारण काय ?
आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेण्यात अगदी सुरूवातीपासूनच पुढे आहेत. आरोग्य क्षेत्रातील नवीन बदलांना तातडीने प्रतिसाद देऊन उत्साहाने रूग्णांना सेवा देतात. मात्र, पोलीस व शासनाच्या विविध विभागातील फ्रन्ट लाईन कर्मचाऱ्यांकडून लस घेण्याचा वेग वाढला. ८ हजार ७०४ पैकी ३ हजार ७३६ जणांनी लस घेतली. ४ हजार ९६८ जण शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांची धास्ती कशाची, याचा शोध घेऊन तातडीने समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले.
९ हजार ९९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लक
जिल्ह्यातील १७ लसीकरण केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या दोनही श्रेणीतील २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांपैकी सोमवारपर्यंत १६ हजार २३७ जणांनी लस घेतली. ९ हजार ९९०४ कर्मचाऱ्यांचे डोस शिल्लक आहेत.