शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम हवा; विधी तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 07:00 IST

१२३ वर्षांपूर्वी ब्रिटीश काळातील कायदा साथरोग रोखण्यासाठी सक्षम आहे काय अथवा काही त्रुटी असतील तर त्यावर पर्याय कोणते, यासंदर्भात विधी तज्ज्ञांशी संवाद साधला असता ‘कोरोना’विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम असावा, असा सूर पुढे आला आहे.

ठळक मुद्दे१२३ वर्षांपूर्वीच्या साथरोग प्रतिबंध कायद्यात बदलाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : कोवीड-१९ या आजाराच्या प्रतिबंधासाठी विकसित राष्ट्रांपासून तर विकसनशिल राष्ट्रांनी सारी शक्ती पणाला लावली. अनेक राज्ये विविध कायद्यांचा आधार घेऊन लॉकडाऊन लागू केले. महाराष्ट्रातही साथरोग (संसर्गरोग) अधिनियम १८९७ नुसार शासनाने नियम तयार केले. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ चाही प्रभावी वापर करून कोरोनाचा मुकाबला करत आहे. मात्र, १२३ वर्षांपूर्वी ब्रिटीश काळातील कायदा साथरोग रोखण्यासाठी सक्षम आहे काय अथवा काही त्रुटी असतील तर त्यावर पर्याय कोणते, यासंदर्भात विधी तज्ज्ञांशी संवाद साधला असता ‘कोरोना’विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम असावा, असा सूर पुढे आला आहे.महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई म्हणजे ब्रिटीश काळातील बॉम्बे स्टेटमध्ये आॅक्टोबर १८९७ च्या सुमारास प्लेगची साथ सुरू झाली होती. ही प्लेगची साथ भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरली. या महामारीचा प्रतिबंध करण्यासाठी जानेवारी १८९७ रोजी व्हायसरॉयच्या परिषदेचे सदस्य सर जॉन वुडबर्न यांनी कायदे मंडळासमोर एक मसूदा मांडला होता. सदर परिषदेत विचारविनिमय करून साथरोग अधिनियम-१८९७ हा कायदा तयार करण्यात आला. साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ या दोन कायद्यांवर आधारीत राज्य सरकारकडून नियम तयार करून प्रतिबंधात्मकउपाययोजना सुरू आहेत.मानवी हक्कांचाही विचार व्हावासाथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ साथरोग रोखण्यास सक्षम नाही. यात केवळ चार कलमे आहेत. त्यामुळे सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ चाही आधार घेतला. साथरोग प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे कामगारांचे स्थलांतरण, प्रवास, अभिव्यक्ती स्वातंत्र व व्यवसायावर गदा आली. घटनेच्या १९ व्या कलमानुसार यावर पर्याय नसल्याने घटनादुरूस्तीची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातच साथरोग प्रतिबंधात्मक तरतुदी करून मानवी हक्कांचे संरक्षण करावे.- अ‍ॅड. प्रशांत खजांची, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ चंद्रपूरलोकशाहीपूरक दुरूस्ती करावीसाथरोगाचा प्रतिबंध कायद्यात सुधारणा व्हावी. हा कायदा सरकारला सर्वोच्च शक्ती प्रदान करणारा आहे. त्यामुळे नागरिकांच्याअधिकारांचे काय असा प्रश्न पुढे येऊ शकतो. साथरोग अधिनियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षेच्या तरतुदी कडक नाहीत. मात्र, दुरूस्ती झाली तर हा कायदा लोकशाही व्यवस्थेला अधिक अनुरूप होईल.- अ‍ॅड. पी. एम. सातपुते, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ, चंद्रपूरन्यायपूर्ण, कालसुसंगत बदल हवासाथरोग प्रतिबंधक कायदा अंमलात आणण्याची गरज भासली नव्हती. मात्र, कोरोनामुळे आज ही वेळ आली. अंमलबजावणीनंतर अनेक प्रश्नही पुढे आले. त्यामुळे १८९७ च्या साथरोग प्रतिबंधक कायद्यात सुधारणेची गरज आहे. कायद्यात कालसुसंगत बदल केल्यास न्यायपूर्ण होऊ शकेल.- अ‍ॅड. विजय मोगरे, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ चंद्रपूरसर्वसमावेश कायदा करावाकोरोनामुळे संपूर्ण जगावरच आरोग्याचे आरिष्ट्य ओढवले आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच साथरोग नियंत्रण कायद्यानुसार उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे कायद्याच्या कार्यक्षमतेचीही पडताळणी होईल. साथरोग रोखण्यासाठी सर्वसमावेश व एकात्मिक कृतियुक्त कायद्याची गरज आहे.- अ‍ॅड. वर्षा जामदार, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस