शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतर धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.

ठळक मुद्देचारही आगारांमधून जिल्हांतर्गत फेऱ्या : पहिल्या दिवशी ५१८ प्रवाशांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्च ते २१ मे या कालावधीत एसटी बस आगारातच होती. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील करण्यात आल्याने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली.एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.बºयाच दिवसानंतर गावखेड्यात जिवाभावाची बस धावताना दिसल्यामुळे अनेकांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.बसमध्ये केवळ दोन-तीनच प्रवासीचंद्रपूर आगारातून सकाळी ६ वाजता बस सोडण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. एका गाडीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी केवळ दोन किंवा तीन प्रवाशांनीच प्रवास केला. काही ठिकाणी तर प्रवासीच नसल्याने अनेक बस रिकाम्याच सोडण्यात आल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नागरिकांनी एसटी बसने प्रवास टाळल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले.मास्क लावूनच बसमध्ये प्रवेशसर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने शासनाने काही अटी, शर्थी ठेवत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून चारही आगारांमधून ठरलेल्या नियोजनानुसार बस सोडण्यात आल्या. सुरुवातीला बसस्थानक व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाश्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासह मास्क लावूनच बसमध्ये प्रवेश देण्यात आला.पहिल्या दिवशी १३३ बसफेऱ्याचंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा व चिमूर आगारातून १३३ बस फेºया चालवण्यात आल्या. यामध्ये १२ हजार ७७२ किलोमीटर लालपरी धावली. शुक्रवारी एकूण १३३ फेऱ्यांमधून ५१८ प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी चारही आगारांमधून जिल्ह्यातंर्गत बसफेºया सोडण्यात आल्या. यासाठी ७२ चालक, वाहक यांना कर्तव्यावर रुजू करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली.जिल्ह्यांतर्गत शुक्रवारी नागरिकांना बससेवेचा लाभ देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात आले. मास्कशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश दिला नाही. पहिल्या दिवशी प्रवाश्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी