शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

दोन महिन्यानंतर धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.

ठळक मुद्देचारही आगारांमधून जिल्हांतर्गत फेऱ्या : पहिल्या दिवशी ५१८ प्रवाशांचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे २२ मार्च ते २१ मे या कालावधीत एसटी बस आगारातच होती. आता लॉकडाऊनच्या अटी शिथील करण्यात आल्याने तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २२ मे रोजी लालपरी प्रवाशांना घेवून रस्त्यावर धावताना दिसून आली.एसटी महामंडळाचे बस म्हणजे सर्वसामान्यांची जिवाभावाची लालपरी. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहचते. मात्र लॉकडाऊनमुळे या लालपरीचे चाकं मागील दोन महिन्यांपासून थांबले होते. मात्र आता राज्य शासनाने नान रेड झोनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आल्या आणि दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांवरून लालपरी धावताना दिसली.बºयाच दिवसानंतर गावखेड्यात जिवाभावाची बस धावताना दिसल्यामुळे अनेकांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.बसमध्ये केवळ दोन-तीनच प्रवासीचंद्रपूर आगारातून सकाळी ६ वाजता बस सोडण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. एका गाडीमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी केवळ दोन किंवा तीन प्रवाशांनीच प्रवास केला. काही ठिकाणी तर प्रवासीच नसल्याने अनेक बस रिकाम्याच सोडण्यात आल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने नागरिकांनी एसटी बसने प्रवास टाळल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले.मास्क लावूनच बसमध्ये प्रवेशसर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, यादृष्टीने शासनाने काही अटी, शर्थी ठेवत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू करण्यास मुभा दिली आहे. यानुसार जिल्ह्यात २२ मेपासून चारही आगारांमधून ठरलेल्या नियोजनानुसार बस सोडण्यात आल्या. सुरुवातीला बसस्थानक व बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाश्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासह मास्क लावूनच बसमध्ये प्रवेश देण्यात आला.पहिल्या दिवशी १३३ बसफेऱ्याचंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा व चिमूर आगारातून १३३ बस फेºया चालवण्यात आल्या. यामध्ये १२ हजार ७७२ किलोमीटर लालपरी धावली. शुक्रवारी एकूण १३३ फेऱ्यांमधून ५१८ प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी चारही आगारांमधून जिल्ह्यातंर्गत बसफेºया सोडण्यात आल्या. यासाठी ७२ चालक, वाहक यांना कर्तव्यावर रुजू करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली.जिल्ह्यांतर्गत शुक्रवारी नागरिकांना बससेवेचा लाभ देण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्यात आले. मास्कशिवाय कोणत्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश दिला नाही. पहिल्या दिवशी प्रवाश्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी