शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोविडमुळे २५७ बालकांचे एक, तर सात जणांचे दोन्ही पालक दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:21 AM

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व ...

चंद्रपूर : कोविडमुळे जिल्ह्यातील २५७ बालकांचे एक पालक आणि सात जणांचे दोन्ही पालक दगावले. पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गुरुवारी आढावा घेऊन संबंधित विभागाला तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, मनपा सहायक आयुक्त विद्द्‌या पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पालक गमाविलेल्या सर्व बालकांची स्वतंत्र फाईल तयार करावी. जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव तयार होऊन शासकीय योजनेचा लाभ देताना अडचण येणार नाही. प्रत्यक्ष भेटीदरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबी, आर्थिक परिस्थिती व चर्चेतून मिळालेली सर्व माहिती फाईलमध्ये नोंदवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भात ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तर शहरी भागात संबंधित नगरपरिषदेला कळवावे. दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या स्थावर व इतर मालमत्तांबाबत जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, ज्या सात बालकांच्या दोन्ही पालकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात बँकांना कळवावे. एक पालक गमाविलेल्या कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

पालक गमावलेली बालके...

कोविडमुळे जिल्ह्यातील सात बालकांनी दोन्ही पालक गमाविले. त्यामध्ये चंद्रपूर व चिमूर येथील प्रत्येकी तीन बालके आणि सावली येथील एका बालकाचा समावेश आहे. एक पालक गमाविलेल्या बालकांची संख्या २५७ आहे. बालकल्याण समितीसमोर २६४ बालकांची यादी पुढील कार्यवाहीकरिता सादर करण्यात आली. यापैकी सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर प्रकरणांची संख्या ३२ असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.