शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

पेरलेल्या बियाण्यांचा शेतकऱ्यांनाच ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रार, बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सध्या सगळीकडे शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात मेहनत घेत आहे. असे असले तरी जिवती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या दिवसात पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून हे बियाणे बोगस आहेत. याची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग जिवती यांच्याकडे तक्रार केली आहे.संपूर्ण जिवती तालुका हा अतिदुर्गम असून येथे कोरडवाहू शेती आहे.कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीनचे पीक या तालुक्यात विशेषत: घेतले जाते. शेतीला सिंचनाची कुठलीही सोय नसताना येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करीत असतो.अशाही स्थितीत शेतकऱ्यांना जर बि- बियाणे बोगस मिळत असतील आणि उगवत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐन हंगामात सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा केला आणि तसा अहवाल कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पाठवला आहे. तेथील अधिकारी सोमवारी शेतात पाहणी करायला येणार आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली असून त्यानुसार शेतात जाऊन आम्ही पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरच्या पातळीवर पाठविला आहे. त्यांची चमू येणार असून त्यानुसार चौकशी होणार आहे.- पल्लवी गोडबोले,तालुका कृषी अधिकारी, जिवती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती