खरीप पेरणीच्या कामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:01:00+5:30
गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून परिसरातील शंकरपूर, हिरापूर, आंबोली, डोमा, नवतळा, मांगलगाव, कवडसी देश, चिचाळा शास्त्री, किटाडी, टवराबोडी, साठगाव कोल्हारी, पांजरेपार, आजगाव, पाचगाव, खैरी, दहेगाव झरी चक जाटेपार, डोंगरगाव आदी गावात बऱ्यापैकी पाऊस आला.

खरीप पेरणीच्या कामांना आला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना आणि उष्णतेने हैराण झालेल्या परिसरातील नागरिकांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकरी कामाला लागले आहेत. खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. यंदा हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत असून परिसरातील शंकरपूर, हिरापूर, आंबोली, डोमा, नवतळा, मांगलगाव, कवडसी देश, चिचाळा शास्त्री, किटाडी, टवराबोडी, साठगाव कोल्हारी, पांजरेपार, आजगाव, पाचगाव, खैरी, दहेगाव झरी चक जाटेपार, डोंगरगाव आदी गावात बऱ्यापैकी पाऊस आला. या भागातील शेतकरी आनंदी असून सोशल डिस्टन्स ठेवत शेतातील पेरणीच्या कामाला लागले आहेत. अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने व उष्णतेने नागरिक वैतागून गेले होते. दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा पारा कमी झाला असून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत.
कोरोना व उष्णतेमुळे गेल्या अडीच महिन्यात हैराण झालो होतो. दोन-तीन दिवसांपासून पाऊस झाल्याने समाधान वाटले. आता मजुरामध्ये सोशल डिस्टन्स ठेवत हळूहळू खरिपाची पेरणी सुरु केली आहे.
- शेषराव राऊत, शेतकरी, शंकरपूर.