शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वाघाच्या दहशतीत शिक्षणाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:35 AM

तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे. या परिस्थितीत पद्मापूर येथील पाचवी ते सातवी या वर्गातील २३ विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून तीन किमी अंतरावरील भूज येथील शाळेत पाय जावे लागत आहे. वाघाच्या दहशतीत ते शिक्षणाची वारी करीत आहे.पद्मापूर-भूज गट ग्रामपंचायत आहे. पद्मापूरची लोकसंख्या ६८० आहे. या गावात वर्ग पहिली ते चवथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहे. मात्र इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी तीन किमी अंतरावर असलेल्या भूज येथील शाळेत जावे लागते. पद्मापूर-भूज या मार्गावर अनेकदा सकाळी आणि सायंकाळी सातत्याने पट्टेदार वाघाचे दर्शन होते. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक धजावत नाही. त्यामुळे २२० दिवसांपैकी जवळपास १०० दिवसांची शाळा बुडते. रात्री गावात पोहोचायला विद्यार्थ्यांना उशीर व्हायला नको, यासाठी अंधार पडायच्या आत ४ वाजताच शाळेला सुटी दिली जाते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पद्मापूर येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतावर काम करीत असलेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. १८ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास पद्मापूर-भूज मार्गावर वाघाने तळ ठोकला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच जाऊ शकले नाहीत.१ मार्चपासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावर पट्टेदार वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत बस उपलब्ध आहे. परंतु तिची आणि शाळेची वेळ जुळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करीतच शाळेत जावे लागते.

टॅग्स :Tigerवाघ