शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

टीईटी पास नसलेल्या ५७ शिक्षकांची नोकरी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST

चंद्रपूर : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकरीवर असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक ...

चंद्रपूर : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा पात्र नसलेल्या आणि नोकरीवर असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ५७ शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमच्या तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली आहे. असे असले तरी काही खासगी शिक्षक संस्थानी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. दरम्यान, या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदतही दिली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये या शिक्षकांनी टीईटी पास केली नाही. परिणामी नुकत्याच लागलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा सर्वांवर आता गडांतर येणार आहे.

मागील काही वर्षांपासून राज्यात डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र यातील अनेकांना नोकरी लागली नाही. दुसरीकडे टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेले पगार घेत आहेत. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर शिक्षक पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे बेरोजगार असलेले टीईटी उत्तीर्ण विद्यार्थीही आपल्यावरील अन्यायासाठी प्रशासकीय स्तरावर दाद मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

एकूण शिक्षक- १४,००५

अनुदानित शाळांतील शिक्षक-४,४७४

कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक-३,१३२

बाॅक्स

टीईटी पास नसलेले शिक्षक (माध्यमिक) ५७

कोट

टीईटी उत्तीर्ण संदर्भात शासनस्तरावर जे आदेश येतील त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार की नाही याबाबत आत्ताच बोलणे उचित ठरणार नाही.

-उल्लास नरड

शिक्षणाधिकारी, माध्यमिक

कोट

जिल्ह्यातील काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नसेल. तर त्यांना आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांच्या मुलाबाळांसह कुटुंबाचा प्रश्न उभा होण्याची शक्यता आहे.

-प्राचार्य नरेंद्र बोबडे

अध्यक्ष,जिल्हा मुख्याध्यापक असो.चंद्रपूर

कोट

टीईटी पास नसलेल्या शिक्षकांना मुदतवाढ दिली पाहिजे. या शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. शासनाने त्यांना मान्यता सुद्धा दिली आहे. पगार दिला जातो. त्यामुळे आता कारवाई करणे हे अत्यंत चुकीचे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर नियुक्ती झाली तर त्यांच्यावर कारवाई करावी.

-सुधाकर अडबाले

सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ