नांदा नगरीत जय गुरुदेवचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:37 IST2017-02-02T00:37:15+5:302017-02-02T00:37:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या ६० व्या स्मृतीदिन यानिमित्त नांदा येथे दोन दिवसीय भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नांदा नगरीत जय गुरुदेवचा गजर
भजने ठरली आकर्षणाचे केंद्र : कीर्तनकारांनी केले जनप्रबोधन
आवाळपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी व वैराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या ६० व्या स्मृतीदिन यानिमित्त नांदा येथे दोन दिवसीय भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता अभियानाने सुरुवात झाली. प्रार्थना स्थळावर काही ज्येष्ठ मंडळाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर तळोधी येथील नगाजी भजन मंडळ तळोधी या चिमूरड्यांच्या भजनाने अख्या गावाला मंत्रमुग्ध केले.
‘क्या किया, क्या किया, क्या किया रे
तुने जीवन गमाई दिया क्या किया रे
जिसे पाना था उसको तो खो दिया’
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवनात मानवाने काय केले आहे. आणि आपल्या स्वार्थासाठी माणुसकीसुद्धा सोडली जात आहे. या गाण्याने चिमूकल्या बालिकेने अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आणले. तर इतर बाहेर गावून आलेल्या भजन मंडळीने भजनाच्या मैफिलीत भर टाकली. भजनाचा मनमुराद आनंद लुटण्याची ग्रामवासियांना संधी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणारे, गुरुकुंज मोजरी येथील पंकज पाल महाराज यांचा सप्तखंजेरी वादनाचे. त्यांनी आपल्या वाणीने तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचा मनोरंजनात्मक पोवाडा वाचून लोकांच्या मनात संताचे संदेश पोहोचविले.
सकाळी पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. यात दहा गावातील भजन मंडळींनी सहभाग दर्शविला होता.
याप्रसंगी वेगवेगळ्या संतांची आणि वेगवेगळ्या पोषाखांनी पालखी सोहळ्यात अधिकचा रंग भरला. त्यात प्रत्येक भजनधारी आणि लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत श्री ‘गुरुदेव की जय’ ही घोषणा देत अखे गाव गजराने निनादले होते. विरुर स्टे. येथील भजन मंडळ नागरिकांचे आकर्षण ठरले होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गुरुकुंज आश्रम मोजरी येथील रविदादा मानव यांनी सामुदायिक प्रार्थनेवर नागरिकांना संबोधित केले.
‘है प्रार्थना गुरुदेव से
यह स्वर्ग सम संसार हो ’
अशा प्रकारे त्यांनी ग्रमावासीयांना प्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले.
सामुदायिक प्रार्थना राष्ट्रीयत्वाचे वारे निर्माण करीत जग नंदनवन बनतील. ती समाजाला सामुदायीक वृत्ती निर्माण करणार. यामुळे विश्वबंधूत्त्वाचे प्रेम समाजात पेरले जातील. राष्ट्रात क्रांती होत आहे. पण ती फार मंदगतीने होत आहे. ही मालिनता प्रार्थनेने दूर होईल. शुद्धता प्रार्थनेने निर्माण होईल. ही प्रार्थना घराघरात दैवी शक्ती निर्माण करणार, हे निश्चित. तुमची मुले सुखसमाधानाने जगू लागतील. एवढेच नाही तर काही संत म्हणून सुद्धा उदयास येतील.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सरकारी खात्यात लागणाऱ्या गावातील तरुण मंडळींचा सत्कारसुद्धा करण्यात आला. साक्षी अतकारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम यावेळी झाला. डाखरे महाराज, सुरेश चौधरी महाराज, जंगलू गोवारदिपे, उपरे महाराज यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन भास्कर लोहबळे यांनी केले तर आभार मारोती जमदाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समस्त गुरुदेवभक्तांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)