शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्देइरईत ५९ टक्के पाणीसाठा : मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात दुप्पट जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिन्यात सातत्याने पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे. जुलै महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा मोठ्या जलाशयात एकूण सरासरी ६०.४८ टक्के पाण्याची साठवणूक झाली आहे. डोंगरगाव प्रकल्प तर आताच ओव्हरफ्लो झाला आहे तर आसोलामेंढा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव यामध्ये पाण्याची साठवणूक होऊ लागली आहे. जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी बघितले तर ६०.४८ टक्के जलसाठा झाला आहे. या सिंचन प्रकल्पांवर खरीप आणि रबी दोन्ही हंगामाची धुरा असते. आता जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंतच या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकरी आनंदले आहे.डोंगरगाव प्रकल्प ओव्हरफ्लोजिल्ह्यातील दहा प्रकल्पांपैकी डोंगरगाव सिंचन प्रकल्प आताच ओव्हरफ्लो झाला आहे. तर असालामेंढा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सध्या ९२.७२ टक्के जलसाठा आहे. येत्या काही दिवसात आसोलामेंढा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस