शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्देइरईत ५९ टक्के पाणीसाठा : मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात दुप्पट जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिन्यात सातत्याने पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे. जुलै महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा मोठ्या जलाशयात एकूण सरासरी ६०.४८ टक्के पाण्याची साठवणूक झाली आहे. डोंगरगाव प्रकल्प तर आताच ओव्हरफ्लो झाला आहे तर आसोलामेंढा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव यामध्ये पाण्याची साठवणूक होऊ लागली आहे. जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी बघितले तर ६०.४८ टक्के जलसाठा झाला आहे. या सिंचन प्रकल्पांवर खरीप आणि रबी दोन्ही हंगामाची धुरा असते. आता जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंतच या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकरी आनंदले आहे.डोंगरगाव प्रकल्प ओव्हरफ्लोजिल्ह्यातील दहा प्रकल्पांपैकी डोंगरगाव सिंचन प्रकल्प आताच ओव्हरफ्लो झाला आहे. तर असालामेंढा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सध्या ९२.७२ टक्के जलसाठा आहे. येत्या काही दिवसात आसोलामेंढा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस