शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सिंचन प्रकल्प ६० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली.

ठळक मुद्देइरईत ५९ टक्के पाणीसाठा : मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात दुप्पट जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिन्यात सातत्याने पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे. जुलै महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील दहा मोठ्या जलाशयात एकूण सरासरी ६०.४८ टक्के पाण्याची साठवणूक झाली आहे. डोंगरगाव प्रकल्प तर आताच ओव्हरफ्लो झाला आहे तर आसोलामेंढा ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने प्रारंभी शेतकऱ्यांना दगा दिला. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले. मात्र लवकरच तो गायब झाला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. जुलै महिन्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जुलैच्या पंधरवाड्यानंतर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नदी, नाले, बोड्या, तलाव यामध्ये पाण्याची साठवणूक होऊ लागली आहे. जिल्ह्यात दहा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी बघितले तर ६०.४८ टक्के जलसाठा झाला आहे. या सिंचन प्रकल्पांवर खरीप आणि रबी दोन्ही हंगामाची धुरा असते. आता जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंतच या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने शेतकरी आनंदले आहे.डोंगरगाव प्रकल्प ओव्हरफ्लोजिल्ह्यातील दहा प्रकल्पांपैकी डोंगरगाव सिंचन प्रकल्प आताच ओव्हरफ्लो झाला आहे. तर असालामेंढा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात सध्या ९२.७२ टक्के जलसाठा आहे. येत्या काही दिवसात आसोलामेंढा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस