भाजीपाल्याऐवजी फुलांच्या शेतीकडे वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:40+5:30
देलनवाडी हे गाव शंकरपट तसेच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. कायदे बदलल्याने शंकरपट बंद झाला. देलनवाडी व पळसगावच्या सीमेवरून बोकडी नदी लहान असल्याने दोन्ही गावच्या शेतकºयांना पाण्याचा लाभ घेता येतो. वीजपंप व अथवा विहिरी नसतानाही बोकडी नदीचे पाणी शेतकरी नदीतच खड्डा करून अडवतात आणि मोटाच्या सहाय्याने भाजीपाला लागवडीसाठी वापरतात.

भाजीपाल्याऐवजी फुलांच्या शेतीकडे वाढतोय कल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे अनेक वर्षांपासून भाजीपाला लागवड केला जात आहे. मात्र, यातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नगदी पिकांचा पर्याय स्वीकारला. भाजीपाला पिकविणाºया शेतीचे फूलांच्या शेतीत रूपांतरण करण्यात यश मिळविले आहे.
देलनवाडी हे गाव शंकरपट तसेच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. कायदे बदलल्याने शंकरपट बंद झाला. देलनवाडी व पळसगावच्या सीमेवरून बोकडी नदी लहान असल्याने दोन्ही गावच्या शेतकºयांना पाण्याचा लाभ घेता येतो. वीजपंप व अथवा विहिरी नसतानाही बोकडी नदीचे पाणी शेतकरी नदीतच खड्डा करून अडवतात आणि मोटाच्या सहाय्याने भाजीपाला लागवडीसाठी वापरतात. धान पिकाबरोबरच भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले जाते. गुरूवारी नवरगावात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे विक्रीचाही प्रश्न निर्माण होत नाही. देलनवाडी येथील गोड वांगे तालुक्यात आजही प्रसिद्ध आहे. मात्र, मोटेने पाणी ओढण्याची पद्धत हळूहळू बंद झाली. बºयाच शेतकºयांनी योजनेद्वारे विहिरी खोदल्या. हातपंपाची सुविधा निर्माण केली. पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे पाहून शेतकºयांनी भाजीपाला लागवडीचे क्षेत्र कमी केले. भाजीपाला सोबतच आता इतरही पिके घेत असल्याने स्थिती सुधारत आहे.
बोकडी नदी ठरली वरदान
भाजीपालासोबत इतरही पिके घेतली जात आहेत. यातून अधिक उत्पादन होत आहे. देलनवाडी येथून पळसगाव मार्गाने गेल्यास रस्त्याच्या दुतर्फा आता विविध फुलांचे बगीचे बघायला मिळतात. यामध्ये डेजी सफेद, डेजी पिवळे, झेंडू, शेवंती अशा विविध जातीच्या फुलांचा समावेश आहे. बारमाही कामामुळे मजुरांनाही रोजगाराचा आधार मिळाला. शेतकºयांसाठी बोकडी नदी वरदान ठरली आहे.
कृषी योजनांची गरज
देलनवाडी परिसरात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने अनेक शेतकºयांनी आधुनिक शेतीची कास धरली. परंतु, राज्य शासनाचे कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या विविध योजना अद्याप पोहोचल्या नाही. शेतकºयांचा कल लक्षात घेऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास हा परिसर तालुक्यासोबतच जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरू शकतो.