जिल्ह्यात खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:42+5:30
मागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते.

जिल्ह्यात खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सतत सुरू असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. शिवाय सततच्या ढगाळ वातावरणामध्ये पाऊसही कोसळत असल्यामुळे शेतात काम करताच येत नसल्याने मशागतीवरही परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना फवारणीसाठी वेळच मिळत नसल्याने खरीप पिकांवर
मागीलकाही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. तसेच पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट हाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू असल्याने शेतकरी हतलब झाला आहे. पिकांच्या वाढीकरिता पावसाची जास्त गरज असते. मात्र, गरजेपेक्षा जास्त पावसामुळेही पिकांची वाढ खुंटते, निरनिराळ्या रोग व किडींची वाढ होते. यावर्षी सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून संततधार पावसाची हजेरी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. कृषी व महसूल विभागामार्फत नुकसानाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
यंदा खरीप हंगामाची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात झाली. पावसाने सुध्दा वेळोवेळी हजेरी लावली. त्यानंतर तालुक्यात जुलैमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर ऑगस्टमहिन्यात सतत पाऊसकोसळत असल्याने आणि आकाशात ढग आच्छादित असल्यामुळे पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळणे बंद झाले आहे. सध्या १५.२० दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू असल्याने खरीप पिकांतील तण वाढले आहे. त्यामुळे पेरणीपेक्षा निंदनाच्या खर्च अधिक करावा लागत आहे. खरीप पिकांची अवस्था वाईट झाली आहे.