भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:24+5:30
मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.

भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शेतकरी कापूस, धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करतात. यावर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून विविध किटकनाशकांची फवारणी करून रोगांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.
ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर पालेभाज्यांची आवक चंद्रपूर बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी आधुनिक पद्धतीने रबी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता भाजीपाला पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.
गव्हावर अळीचा प्रादुर्भाव
परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेली. आता रब्बीच्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. हरभरा पाठोपाठ गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाळत चालली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यावेळी सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने मोठे नुकसान झाले. मात्र यावर्षी नदी-नाले तलाव, विहिरीत भरपूर पाणी असल्याने रब्बीची पेरणी केली. पाणी देणे, खत टाकणे हे काम सुद्धा चालू आहे. परंतु हरभरा पाठोपाठ आता गव्हाची उभी पिके वाळत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी खरीब हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. त्यामुळे सरकार आर्थिक मदत करेल या आशेवर शेतकरी आहे. तर दुसरीकडे या हंगामातील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे परिणाम पडत आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
-रामदास देवाळकर, शेतकरी, गोवरी