प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:33+5:30

नागभीड येथे ७ जून रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हा रिपोर्ट हाती पडताच प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. परिसर सील करताना रुग्ण राहत असलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागही घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Increased problem due to restricted area | प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ

प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ

ठळक मुद्देरुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह : नियम शिथिल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ झाली आहे. आता संपर्कातील व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने या प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथिल करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
नागभीड येथे ७ जून रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हा रिपोर्ट हाती पडताच प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. परिसर सील करताना रुग्ण राहत असलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागही घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
या प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नागरिक शेतीशी संबंधित आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांंची आवते व पऱ्हे भरण्याची वेळ आहे. पण परिसर सील करण्यात आल्यामुळे या परिसरात राहणाºया शेतकऱ्यांना बाहेर पडता येत नाही. याच परिसरात नोकरदार वर्गही आहे. त्यांनाही त्यांच्या कामावर जाता येत नाही.
याशिवाय याच प्रतिबंधित क्षेत्रात अनेक व्यापाºयांची निवासस्थाने आहेत. त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने शहरात असली तरी निवासस्थान प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने त्यांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कोरोना रूग्ण ७ जूनला आढळून आला. त्यानंतर या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचेही नमुने निगेटिव्ह आले. या पार्श्वभूमीवर या परिसरात राहणारे शेतकरी व व्यापाºयांना त्यांच्या कामावर जाऊ द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.

दुकाने ७ वाजेपर्यंत सुरू ठेवावी
सध्या ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. नागभीड नगर परिषद असली तरी येथे शेतकऱ्यांची व शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांची संख्या मोठी आहे. हे दोन्ही वर्ग अगदी सकाळपासून शेतीच्या कामासाठी शेतावर जातात. सायंकाळी ६ नंतरच ते घराकडे परततात. मात्र दुकाने ५ वाजताच बंद होत असल्याने जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी मोठी तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन दुकाने ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असणे ही नागरिकांची गरज आहे. येथे शेतकरी व शेतमजूर वर्ग मोठा आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा वर्ग शेतातच असतो. त्यामुळे ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी.
- गुलजारभाई धम्माणी, अध्यक्ष, व्यापारी संघ, नागभीड

Web Title: Increased problem due to restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.