शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

फिटनेसबाबत वाढली जागरूकता, लाकडी घाण्याच्या तेलाकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:46 IST

आरोग्यासाठी लाभदायक : शहरातील नागरिकांकडून मागणी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक उद्योगांपैकी एक असलेला लाकडी घाणा तेल उद्योगाला आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत. मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ हा व्यवसाय संपला होता; पण वाढते प्रदूषण, डिजिटल युगात अनेकजण केमिकलविरहित, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तेल वापरणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पुन्हा ग्रामीणसह शहरी भागातही लाकडी घाण्याला चांगले दिवस येत आहेत. या तेलामुळे आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तेल काढण्याचे घाणे होते. अनेक व्यावसायिक, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला देखील काम मिळत होते. बहुतांश शेतकरी शेतात पिकविलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल घेत. शिवाय पशुखाद्य म्हणून सरकी, करडी पेंढीचा उपयोग व्हायचा, तसेच केमिकलविरहित तेल खायला मिळत होते. दरम्यान, रिफाइंड तेलाच्या वापरामुळे या व्यवसायाला घरघर लागली; परंतु आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला खाण्याचे शुद्ध तेल मिळावे म्हणून पुन्हा तेलबीयांचे उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी करडई, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे लाकडी घाण्याच्या तेलाचे प्रमाण देखील वाढत आहे.

तेलाला नैसर्गिक सुगंध, पोषक घटकांचा समावेशघाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबा- बतच्या जागरूकतेचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे.

अनेकांच्या हाताला कामलाकडी घाण्यातील तेल प्रक्रियेत गळीत धान्य निवडण्यापासून ते तेल मिळेपर्यंतच्या विविध स्तरांवर कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे भागात पुन्हा कामगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

मागणी अधिकसध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबीयांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते.फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.

चंद्रपूर शहरात आठ ते दहा घाणेघाण्याच्या तेलाची मागणी वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काहींनी घाणीचे तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरमध्ये आठ ते दहा घाण्या असून या व्यावसायिकांकडे तेल घेणाऱ्यांची बरीच गर्दी दिसून येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स