शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

फिटनेसबाबत वाढली जागरूकता, लाकडी घाण्याच्या तेलाकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:46 IST

आरोग्यासाठी लाभदायक : शहरातील नागरिकांकडून मागणी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक उद्योगांपैकी एक असलेला लाकडी घाणा तेल उद्योगाला आता पुन्हा चांगले दिवस येत आहेत. मधल्या काळात रिफाइंड तेलाच्या वापरामुळे जवळजवळ हा व्यवसाय संपला होता; पण वाढते प्रदूषण, डिजिटल युगात अनेकजण केमिकलविरहित, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले तेल वापरणे पसंत करीत आहेत. त्यामुळे पुन्हा ग्रामीणसह शहरी भागातही लाकडी घाण्याला चांगले दिवस येत आहेत. या तेलामुळे आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तेल काढण्याचे घाणे होते. अनेक व्यावसायिक, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला देखील काम मिळत होते. बहुतांश शेतकरी शेतात पिकविलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल घेत. शिवाय पशुखाद्य म्हणून सरकी, करडी पेंढीचा उपयोग व्हायचा, तसेच केमिकलविरहित तेल खायला मिळत होते. दरम्यान, रिफाइंड तेलाच्या वापरामुळे या व्यवसायाला घरघर लागली; परंतु आरोग्याच्या अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला खाण्याचे शुद्ध तेल मिळावे म्हणून पुन्हा तेलबीयांचे उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी करडई, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे लाकडी घाण्याच्या तेलाचे प्रमाण देखील वाढत आहे.

तेलाला नैसर्गिक सुगंध, पोषक घटकांचा समावेशघाण्यावर काढलेल्या तेलाला नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या काही दिवसांत लाकडी घाण्यावरील तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्यावरील तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबा- बतच्या जागरूकतेचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे.

अनेकांच्या हाताला कामलाकडी घाण्यातील तेल प्रक्रियेत गळीत धान्य निवडण्यापासून ते तेल मिळेपर्यंतच्या विविध स्तरांवर कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे भागात पुन्हा कामगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.

मागणी अधिकसध्या लाकडी घाण्याच्या तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबीयांचे लाकडी घाण्यामधून तेल काढले जाते.फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते.

चंद्रपूर शहरात आठ ते दहा घाणेघाण्याच्या तेलाची मागणी वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काहींनी घाणीचे तेल काढण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरमध्ये आठ ते दहा घाण्या असून या व्यावसायिकांकडे तेल घेणाऱ्यांची बरीच गर्दी दिसून येते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स