शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
3
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
4
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
5
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
6
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
7
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
8
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
9
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
10
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
11
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
12
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
13
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
14
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
15
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
16
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
18
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
19
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
20
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्राची अंमलबजावणी न केल्याने रुग्ण मृत्यू संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

चंद्रपूर : नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे मृत्यू अधिक आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे अपुरे नियोजन याला कारणीभूत आहे. शासकीय ...

चंद्रपूर : नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे मृत्यू अधिक आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे अपुरे नियोजन याला कारणीभूत आहे. शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा व प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राची अंमलबजावणी न केल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात भरमसाट वाढ होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविलेल्या एका पत्रातून केली आहे.

जिल्ह्यात मेडिकल काॅलेज, शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभावही पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत्यू संख्येला कारणीभूत आहे. शासनाच्या निर्देशामुळे काॅन्ट्रॅक्ट पद्धतीने डाॅक्टर व इतर स्टाफच्या नियुक्तीचे अधिकार असताना नियुक्तीस विलंब, काेरोनामध्ये काम करणाऱ्या स्टाफला वेतन देण्यास नकार. एकूणच अपुऱ्या स्टाफमुळे दररोज २० ते ३० रुग्ण मृत्युमृखी पडत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.

खनिज निधीत भरमसाट पैसा आहे. जिल्हा नियोजन फंडातून ३० टक्के खर्चाचे अधिकार असताना डाॅक्टर व इतर मेडिकल स्टाफची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणांच्या चौकशीची मागणीही नरेश पुगलिया यांनी केली आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य नियोजन करण्याची ताकीद देण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले; परंतु अंमलबजावणी कोण करणार, असा सवाल पुगलिया यांचा आहे. पहिल्या लाटेत २०० वर, तिसऱ्या लाटेत १२५० वर मृत्यूचा आकडा गेला आहे. आतातरी सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व उच्च न्यायालयात शपथपत्र देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा त्यांची आहे. म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात २० रुग्ण आढळले आहे. यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर व औषध उपलब्ध करावे, अशी मागणीही करतानाच २० मे रोजी पंतप्रधान देशातील कोरोनाग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा, याकडेही पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.