शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

बल्लारपुरात प्रदूषित हवा, पाणी अन् धुरामुळे आजार, श्वासही कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 18:21 IST

Chandrapur : नागरिकांना भेडसावताहेत विविध आरोग्याच्या समस्या

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहर अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. धूळ, प्रदूषित पाणी, धूर, प्लास्टिक, वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. तर प्राणघातक वायू प्रदूषणामुळे ज्येष्ठाचा श्वास कोंडला आहे.

शहरात पेपर फॅक्टरी, कोळसा उत्पादन, लाकूड आणि वृक्षांनी नटलेले घनदाट वनवैभव असल्यामुळे बल्लारपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारे वनवैभव व उद्योगामुळे होणारे प्रदूषण याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वेकोलि परिसरात कोळशाच्या धुरांमुळे नागरिकांना डोळ्यांचा त्रास, दमा, हृदयविकार, पोटाचे विकार, विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

वर्धा नदीही प्रदूषितबल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पवित्र पाणी काळे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले आहे. ते पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे. प्रत्येक सणासुदीला भाविक वर्धा नदीच्या गणपती घाटावर उत्सव साजरा करण्यासाठी येतात व पाणी ग्रहण करतात व प्रदूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळ नेहमीच दुर्लक्ष करत आहे.

धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ताशहरातून २४ तास शेकडो वाहनातून लोखंड, कोळसा, सिमेंट, लाकूड, बांबू, फ्लाय ऐशचे कण पडणाऱ्या धुळीने प्रदूषण होते. त्यामधून निघणारे पार्टीकल नागरिकांच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होत आहे. अनेक आजार जडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नगर परिषदेच्या शेतावर लावलेले धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ता झाले आहे.

शहरातील जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असल्याने हजारो नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.-अमित पाझारे, पर्यावरणप्रेमी, बल्लारपूर

 

टॅग्स :World Environment DayWorld Environment Daypollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर