शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बल्लारपुरात प्रदूषित हवा, पाणी अन् धुरामुळे आजार, श्वासही कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 18:21 IST

Chandrapur : नागरिकांना भेडसावताहेत विविध आरोग्याच्या समस्या

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शहर अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. धूळ, प्रदूषित पाणी, धूर, प्लास्टिक, वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. तर प्राणघातक वायू प्रदूषणामुळे ज्येष्ठाचा श्वास कोंडला आहे.

शहरात पेपर फॅक्टरी, कोळसा उत्पादन, लाकूड आणि वृक्षांनी नटलेले घनदाट वनवैभव असल्यामुळे बल्लारपूर शहराचे महत्त्व वाढले आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणारे वनवैभव व उद्योगामुळे होणारे प्रदूषण याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वेकोलि परिसरात कोळशाच्या धुरांमुळे नागरिकांना डोळ्यांचा त्रास, दमा, हृदयविकार, पोटाचे विकार, विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे.

वर्धा नदीही प्रदूषितबल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पवित्र पाणी काळे झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्योगांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाले आहे. ते पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेने सांगितले आहे. प्रत्येक सणासुदीला भाविक वर्धा नदीच्या गणपती घाटावर उत्सव साजरा करण्यासाठी येतात व पाणी ग्रहण करतात व प्रदूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळ नेहमीच दुर्लक्ष करत आहे.

धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ताशहरातून २४ तास शेकडो वाहनातून लोखंड, कोळसा, सिमेंट, लाकूड, बांबू, फ्लाय ऐशचे कण पडणाऱ्या धुळीने प्रदूषण होते. त्यामधून निघणारे पार्टीकल नागरिकांच्या डोळ्यात जाऊन डोळे खराब होत आहे. अनेक आजार जडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नगर परिषदेच्या शेतावर लावलेले धूळ प्रदूषण मापक यंत्र बेपत्ता झाले आहे.

शहरातील जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली असल्याने हजारो नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. याकडे जिल्हा प्रशासन व प्रदूषण मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे.-अमित पाझारे, पर्यावरणप्रेमी, बल्लारपूर

 

टॅग्स :World Environment DayWorld Environment Daypollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर