शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:28 IST

मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत : राजुरा येथे शेतकरी व कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, कामगार मेळावा व कृषी प्रदर्शन राजुरा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सत्कारमूर्ती माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुमन मामुलकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, वामनराव कासावार, देवराव भांडेकर, जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके, दत्तात्रय वेगिनवार, सुधाकर कुंदोजवार, श्रीधरराव गोडे, अ‍ॅड. मुरलीधरराव धोटे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, गजाननराव गावंडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, शिवचंद काळे, उत्तम पेचे, साईनाथ बुचे, वसंत मांढरे, तारासिंग, जि. प. सदस्य मेघा नलगे, अ‍ॅड. अरुण धोटे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानावरील स्टॉल लावले होते. यावेळी प्रगत शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. त्यानंतर मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, संचालन आनंद चलाख, प्रा. लाटेलवार तर आभार डॉ. संभाजी वरकड यांनी मानले.

टॅग्स :FarmerशेतकरीNitin Rautनितीन राऊत