शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्धचा लढा जिंंकणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे.

ठळक मुद्देसंजय जयस्वाल : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक म्हणून स्वजिल्ह्याकडेही लक्ष

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोना वायरसमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजबद्ध उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्ध लढा हा देश निश्चितपणे जिंकू शकतो असे मत नागभीडचे सुपूत्र तथा नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जयस्वाल यांचा जन्म नागभीड येथे झाला. १२ वी पर्यंत शिक्षण येथेच पूर्ण केले. वडील नागभीड येथे रेल्वे विभागात नोकरीला होते. डॉ. जयस्वाल यांनी काही वर्ष गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा दिली. प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे. मात्र नागपूर येथे कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करा, असे आवाहन डॉ. जयस्वाल यांनी केले.जुन्या मित्रांशी संवाद कायमआरोग्य उपसंचालक डॉ.जयस्वाल यांची नाळ अजूनही नागभीड शहराशी जुळली आहे. शैक्षणिक जीवनातील त्यांचे अनेक मित्र आहेत. मित्रांशी त्यांचा कायम संवाद असतो. प्रशासकीय व्यस्त जीवनातही ते वेळ काढून शहरात येतात.आरोग्य सेवेत ‘टिमवर्क’ चे भान ठेवाआरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासाठी टीमवर्क महत्त्वाची असते. प्रत्येक शासकीय विभागांचा यात सहभाग असतो. कोरोनाचा प्रतिकार करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, टिमवर्कच्या माध्यमातून आरोग्य विभाग ताकदीने सामना करीत आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या