शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी पुरावा न दिल्यास अन्नसुरक्षा योजनेचे रेशनकार्ड होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST

चंद्रपूर : पात्र नसलेल्या कुटुंबाने शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य घेणे आता लाभार्थ्यांना महागात पडणार असून अन्नधान्य पुरवठा विभागाद्वारे अशा ...

चंद्रपूर : पात्र नसलेल्या कुटुंबाने शिधापत्रिकेद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य घेणे आता लाभार्थ्यांना महागात पडणार असून अन्नधान्य पुरवठा विभागाद्वारे अशा लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. विभागाला दिलेला पुरावा संशयास्पद असल्यास पोलिसांकडूनही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांवर आता चाप बसणार आहे.

अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यात येणार आहे. यामध्ये बीपीएल. अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. कार्डधारक ज्या भागात राहतात. त्या भागातील निवासाचा पुरावा देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पुरावा न दिल्यास संबंधितांचे शिधापत्रिका रद्द होणार आहे. विशेष म्हणजे, पुरावा सादर करताना तो एक वर्षापेक्षा जुना नसावा, हेही तपासले जाणार आहे. नागरिकांना सदर पुरावा संबंधित स्वस्त धान्य दुकान, तहसील कार्यालय, तलाठ्यांकडे द्यावा लागणार आहे.

पुरावा संशयास्पद असल्यास पोलीस विभागाकडून तरासणी केली जाणार आहे. एकाच कुटुंबात विभक्त सद्यांना अंत्योदय किंवा बीपीएलचा लाभ मिळणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.

अंत्योदय

१,३८,०१०

प्राधान्य कुटुंब

२,६३,२६२

केशरी

५५,४३१

हे पुरावे आवश्यक

रेशन कार्डधारक त्याच भागात राहत असल्याचा पुरावा, भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबूक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड आदी पुरावे द्यावे लागणार आहेत.

बाॅक्स

रेशनकार्ड होणार रद्द

रेशनकार्डची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे उत्पन्न एक लाख रुपयांहून जास्त असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्याचे आदेश आहेत. त्यांच्या मागणीनुसार शिधापत्रिका मिळू शकेल. याशिवाय एका कुटुंबात किंवा एका पत्त्यांवर दोन शिधापत्रिका मिळणार नाहीत. दुबार, अस्तित्वात नसलेली व स्थलांतरित व्यक्ती तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहेत.

बाक्स

समिती देणार अहवाल

शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती राहणार आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा समावेश आहे.या शोधमोहिमेदरम्यान, अपात्र ठरविण्यात आलेल्या शिधापत्रिकांचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे.

बाॅक्स

१५ दिवसांची मिळणार मुदत

ज्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात आल्या आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. दरम्यान, ते ज्या परिसरात राहतात त्याचा पुरावा त्यांना १५ दिवसांत द्यावा लागणार आहे. त्यानंतर पुरावा न आल्यास रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया एक महिन्यामध्ये करण्यात येणार आहे.

बाॅक्स

सध्या काय मिळते

शुभ्र व केशरी कार्ड- काहीही मिळत नाही

अंत्योदय-२५ किलो गहू, १० किलो तांदूळ, एक कि.डाळ,

प्राधान्य कुटुंब- ३ किलो गहू, २ किलो तांदूळ, एक किलो. डाळ

--

कोट

शासन निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक माहिती तसेच रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. उत्पन्न अधिक असलेल्यांना लाभ मिळणार नसून त्यांच्या शिधापत्रिका बाद होणार आहे.

-भारतकुमार तुंबडे

प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी, चंद्रपूर.